बृजभूषण राज ठाकरेंना कालनेमी राक्षस म्हणाले, पण हा राक्षस कोण होता?
राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा घोषित केला.. आणि त्यावरून महाभारत घडायला लागलं.. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना याच दौऱ्यावरून इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर राज ठाकरेविरोधात उभं ठाकताना त्यांनी त्यांचा उल्लेख कालनेमी असा केला.. त्यानंतर चर्चा व्हायला लागली की बृजभूषण […]
ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा घोषित केला.. आणि त्यावरून महाभारत घडायला लागलं.. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना याच दौऱ्यावरून इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर राज ठाकरेविरोधात उभं ठाकताना त्यांनी त्यांचा उल्लेख कालनेमी असा केला.. त्यानंतर चर्चा व्हायला लागली की बृजभूषण शरण सिंग यांनी राज कालनेमी असा उल्लेख का केला? कालनेमी कोण होता? तेच आपण आता जाणून घेऊ
बृजभूषण शरण सिंह का म्हणाले, राज ठाकरे रावणापेक्षाही पापी
कालनेमीचा उल्लेख रामायणात
रामायणातल्या कथेसुनार, प्रभू रामचंद्रांचं रावणाबरोबर युद्ध सुरू होतं तेव्हा तेव्हा रावणाने राम-लक्ष्मण यांना हरवण्यासाठी आपला मुलगा इंद्रजित याला पाठवलं. इंद्रजितचं नाव मेघनाथ असंही होतं. त्याने इंद्रालाही हरवलं होतं म्हणून त्याला इंद्रजित म्हणत. मेघनाथाने लक्ष्मणावर अस्त्र चालवलं. त्यामुळे लक्ष्मणाला मुर्छा आली. यानंतर वैद्यराज सुषेण यांच्या सांगण्यावरून प्रभू हनुमान संजीवनी बुटी घ्यायला हिमालयाच्या दिशेने जाऊ लागले. हनुमानाला ही संजीवनी बुटी मिळू नये म्हणून रावणाने मायावी राक्षस कालनेमीला पाठवलं, हिमालयावर पोहोचण्यापूर्वी हनुमानाचा वध करायचा असं कालनेमीला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कालनेमी राक्षसाने एका साधूचा वेश धारण केला आणि रामनामाचा जप करायला सुरूवात केली. प्रभू हनुमान रामनाम ऐकून तिथेच थांबले.