नरेंद्र मोदींचा ‘क्लास’, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis meets Mns chief Raj Thackeray : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. भाजपला कर्नाटकात सत्तेतून पायउतार व्हावं लागलं, तर दुसरीकडे काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. या निकालावर महाराष्ट्रातूनही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरून मनसे भाजपपासून दूर जात आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यातच उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची रात्री उशिरा भेट घेतली. त्यामुळे पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा का सुरू झाल्या, हेच समजून घेऊयात… (Politics of Maharashtra)
कधी देवेंद्र फडणवीस, कधी चंद्रशेखर बावनकुळे, कधी आशिष शेलार आणि इतरही भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्या घरी वाढलेल्या भेटीगाठींनी चर्चा सुरू झाली की दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षावर टीका करण्याचं टाळत असल्याचे दिसून आलं.
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
पण, कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सूर बदललेला दिसला. राज ठाकरे यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवावरून चांगलंच सुनावलं. “मला वाटतं हा पराभव स्वभावाचा आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कुणी वाकडं करू शकतो, अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा”, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> Shiv Sena: ‘शिंदेंचे 22 आमदार, 9 खासदार ठाकरेंच्या संपर्कात’, पुन्हा भूकंप होणार?
राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये उद्भवलेला वाद आणि नोटंबदीच्या निर्णयावरूनही थेट हल्ला केला. राज यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी लागलीच उत्तर दिलं. मोठ्या काळानंतर राज ठाकरे आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसले, त्यामुळे मनसे पुन्हा भाजपपासून दूर जातेय का? अशी चर्चा सुरू झाली.










