IND vs AUS Women Hockey Semifinal: पंचांचा एक निर्णय अन् भारतीय हॉकी संघ पराभूत, सेहवागही संतापला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे खेळल्या जात असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय महिला हॉकी संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. या दमदार खेळामुळे त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पण इथे त्यांना अप्रामाणिकपणाला बळी पडावे लागले. ज्याचा फटका त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने हा सामना 3-0 असा जिंकला. यामध्येच भारतीय संघासोबत अप्रामाणिकपणा झाला, त्यामुळे संपूर्ण संघाचे मनोबल खचले. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही यावर टीका केली आहे.

अशा प्रकारे पेनल्टी शूटआऊटमध्ये फाऊल झाला

शुक्रवारी (5 ऑगस्ट) राष्ट्रकुलमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होता. या सामन्यात पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत ऑस्ट्रेलियाने 1-0 असे वर्चस्व राखले होते, मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने गोल करत सामना बरोबरीत आणला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा एकमेव गोल वंदना कटारियाने 49व्या मिनिटाला केला. यानंतर पूर्ण वेळ संपल्यानंतर सामना अनिर्णित राहिला. यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाने चपळाई दाखवत गोल वाचवला. पण इथे रेफरीने टायमर चालू नसल्याचे सांगितले. यामुळेच ऑस्ट्रेलियाला पुन्हा तीच पेनल्टी द्यावी लागली.

पेनल्टीवर ऑस्ट्रेलियाने हा सामना 3-0 असा जिंकला

घडलेल्या प्रकारामध्ये भारतीय संघाचा काहीच दोष नव्हता, पण रेफरीच्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागली. पुन्हा पेनल्टी देण्यात आली तेव्हा ऑस्ट्रेलियाने कोणतीही चूक केली नाही आणि गोल केला. इथून भारतीय खेळाडूंचे मनोबल घसरले. यामुळेच ऑस्ट्रेलियाने हा सामना 3-0 असा जिंकला. या संपूर्ण घटनेमुळे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह चाहतेही नाराज झाले आहेत. सामन्यातही भारतीय संघाला अतिरिक्त वेळेपर्यंत सामना खेळवण्यात आला होता.

ADVERTISEMENT

‘महासत्ता झालात, तर सगळी घड्याळे वेळेवर सुरू होतील’

व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की समालोचकही तेच बोलत आहेत की यात भारतीय संघाचा काय दोष आहे. यावर वीरेंद्र सेहवागनेही ट्विट करून संताप व्यक्त केला. त्याने लिहिले – ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी हुकली आणि अंपायर म्हणाले, सॉरी घड्याळ सुरू झाले नाही. असा पक्षपातीपणा क्रिकेटमध्येही होत असे, जोपर्यंत आपण महासत्ता बनलो नाही. आम्ही लवकरच हॉकीमध्ये येऊ. मग सर्व घड्याळे वेळेवर सुरू होतील. आमच्या महिला खेळाडूंचा अभिमान आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT