नाडीयादचा जयसूर्या कसा बनला टीम इंडियाचा हिरो?? - Mumbai Tak - from nadiyadwalas jaysurya to team india hero story of axar patel success story - MumbaiTAK
स्पोर्ट्स

नाडीयादचा जयसूर्या कसा बनला टीम इंडियाचा हिरो??

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाने डे-नाईट टेस्टमध्ये इंग्लंडला पहिल्याच दिवशी बॅकफूटवर ढकललं. होम ग्राऊंडवर खेळत असलेल्या अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडची पहिली इनिंग अवघ्या ११२ रन्सवर संपवली. गुजरातच्या नाडीयाद भागात एका छोट्याश्या वस्तीत राहणारा अक्षर पटेल टीम इंडियाचा हिरो कसा बनला याची स्टोरीही तितकीच रंजक आहे. अवश्य […]

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाने डे-नाईट टेस्टमध्ये इंग्लंडला पहिल्याच दिवशी बॅकफूटवर ढकललं. होम ग्राऊंडवर खेळत असलेल्या अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडची पहिली इनिंग अवघ्या ११२ रन्सवर संपवली. गुजरातच्या नाडीयाद भागात एका छोट्याश्या वस्तीत राहणारा अक्षर पटेल टीम इंडियाचा हिरो कसा बनला याची स्टोरीही तितकीच रंजक आहे.

अवश्य वाचा – योगायोग! 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांतची कपिल देव यांच्याशी बरोबरी

लहानपणापासून अक्षर पटेलला क्रिकेटची आवड होती. लेफ्ट आर्म बॉलिंग आणि बॅटींग अशा ऑलराऊंड खेळामुळे त्याला नाडीयादचा जयसूर्या असं टोपण नाव पडलं. क्रिकेटमध्ये आपण करिअर करु शकतो हे आपल्या वडिलांना समजवून सांगायला अक्षरला बरेच कष्ट घ्यावे लागले. आपला मुलगा फिट रहावा आणि इतर मुलांसोबत त्याने वेळ वाया घालवू नये यासाठी अक्षरच्या वडीलांनी सुरुवातीला त्याला क्रिकेटच्या प्रॅक्टीसला जाण्याची परवानगी दिली.

काही वर्षांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अक्षर पटेलच्या वडिलांनी एक सुंदर आठवण सांगितली होती. ज्यावेळी राजेश पटेल अक्षरच्या कोचला भेटले त्यावेळी त्यांनी कोचना अक्षरच्या खेळाची फारशी चिंता करु नका. फक्त त्याला एवढं पळवा की संध्याकाळी घरी आल्यावर तो झोपला पाहिजे. पण अक्षरने या संधीचं सोनं केलं आणि क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सहा महिन्यांनंतर अक्षरने आपल्या शाळेच्या टीमचं नेतृत्व केलं. कालांतराने अक्षरची U-16 साठीच्या संघात निवड झाली ज्यात त्याने ९८ रन्स आणि ३ विकेट घेतल्या.

अवश्य वाचा – होम ग्राऊंडवर चमकला अक्षर पटेल, इंग्लंडच्या डाव गुंडाळला

नाडीयादचा हा जयसूर्या अहमदाबादच्या ग्राऊंडवर टीम इंडियासाठी हिरो ठरला. अहमदाबादच्या पिचवर अक्षरने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. टेस्ट करिअरमध्ये पाच विकेट घेण्याची अक्षरची ही दुसरी वेळ ठरली. त्यामुळे भविष्यातही नाडीयादचा हा जयसूर्या टीम इंडियाच्या मदतीसाठी धावून येईल अशी सर्व फॅन्सना आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 6 =

Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर