IPL 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची यंदा अशी गत का झाली? जाणून घ्या कारणं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत दोन संघांनी प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. सध्या साखळी फेरीत चौथ्या स्थानासाठी कोलकाता, मुंबई, पंजाब या संघांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे. परंतू यंदाच्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी काहीशी डामाडौल राहिली.

पाचवेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला यंदाच्या हंगामात आपली लय पकडता आलीच नाही. पहिल्या सत्रात भारतामध्ये आणि दुसऱ्या सत्रात युएईत मुंबई इंडियन्सचं तळ्यात-मळ्यात सुरुच होतं. युएईत दाखल झाल्यानंतर पंजाबविरुद्ध सामन्यात विजय सोडला तर मुंबईच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे असं नेमकं झालं तरी काय की गतविजेत्या मुंबई संघावर अशी वेळ आली? जाणून घेऊयात कारणं…

कारण पहिलं – सूर्यकुमार आणि इशान किशनचं अपयश

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचं सर्वात मोठं कारण आहे दोन्ही खेळाडूंचा फॉर्म खराब असणं. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी- कॉक हे संघाला चांगली सुरुवात करुन देत असले तरीही त्यांच्या कामगिरीत सातत्य नाहीये. सूर्यकुमार आणि इशान किशन फॉर्मात नसल्यामुळे मुंबईला मधल्या फळीत अनेक बदल करावे लागले, ज्यामुळे हा संघ यंदा स्थिरावलेलाच दिसला नाही. कधी इशान किशन तर कधी सौरभ तिवारी यामध्येच मुंबईचा संघ अडकून राहिला.

IPL 2021 : गतविजेत्यांचं भवितव्य ‘जर-तर’ वर, प्ले-ऑफ प्रवेशासाठी काय आहे मुंबईसमोरचे निकष?

ADVERTISEMENT

RCB विरुद्धचा सामना मुंबईच्या या अवस्थेचं चित्रण करण्यासाठी उत्तम उदाहरण आहे. सलामीवीरांनी या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली होती, पण त्यांच्यानंतर मुंबईचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. ५७ धावांवर संघाने एकही विकेट गमावली नव्हती, पण पुढे १११ धावांवर संघ सर्वबाद झाला. सूर्यकुमारने या सामन्यात ८ आणि ईशान किशनने ९ धावा केल्या.

ADVERTISEMENT

कारणं दुसरं – मधल्या फळीचं फॉर्मात नसणं

पोलार्ड, पांड्या बंधू अशी भक्कम फलंदाजांची फौज असलेली मुंबई इंडियन्सची मधली फळी यंदा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आतापर्यंत एकाही सामन्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज मधल्या फळीत अपेक्षित योगदान देऊ शकले नाहीयेत. RCB विरुद्ध सामन्यात मुंबईतल्या अखेरच्या फलंदाजांनी एकूण पाचच रन्स केल्या.

IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईची आशा धुसर, रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

यापूर्वी केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईच्या सलामीवीरांनी ७८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यातही रोहित बाद होताच मुंबईचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. संघाने पुढच्या ६४ चेंडूत केवळ ७७ धावा केल्या.

कारण तिसरं – हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयी तक्रारी

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फिट नसल्यामुळे संघाच्या अडचणी यंदाच्या हंगामात आणखी वाढल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यात हार्दिक खेळला नाही. आरसीबीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हममध्ये संधी दिली गेली, पण या सामन्यात पांड्याने एकही चेंडू टाकला नाही. फलंदाजीमध्ये त्याने केवळ तीन धावा केल्या. अष्टपैलू असल्यामुळे त्याने संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. त्याच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांच्यावरील दबाव वाढला आहे आणि त्यामुळेच त्यांनाही त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

कारण चौथं – मैदानावर आक्रमकता दाखवण्यात मुंबई इंडियन्स अपयशी

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्स संघ आक्रमक क्रिकेट खेळताना दिलसा नाही. हे देखील संघाच्या खराब प्रदर्शनाचे एक प्रमुख कारण आहे. संघाचा संचालक झहीर खानने आरसीबीविरुद्ध सामना गमावल्यानंतर या गोष्टीची पुष्टी केली. त्याने सांगितले आहे की, “दुबईची खेळपट्टी चांगली होती. या खेळपट्टीवर आरसीबीने १६५ धावा केल्या आणि आम्हीही चांगली सुरुवात केली होती. मात्र, आमच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. आम्ही आक्रमक क्रिकेट खेळत नाही आहोत. जर तुम्ही चांगल्या सुरुवातीनंतरही लवकर-लवकर विकेट्स गमावत राहिलात, तर नंतर सामन्यात पुनरागमन करणं शक्य होत नाही. आम्ही तुकड्या-तुकड्यांमध्ये चांगले खेळत आहोत.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT