“धोनी RCB चा कर्णधार असता, तर तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती”, वसीम अक्रम असं का म्हणाला?
महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)जर आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरूचा कर्णधार असता तर त्याने आतापर्यंत बंगळूरूला तीनचा चॅम्पियन बनवलं असतं, असे विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) केले आहे.या त्याच्या विधानाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT

आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तत्पुर्वी आयपीएलमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पाडतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये सामने जात असून प्रेक्षकांना थरारक सामने पाहता येत आहे. या दरम्यानच आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह (MS Dhoni) धोनीबाबत मोठं विधान केले आहे. या त्याच्या विधानाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ( ms dhoni were rcb captain he would have won 3 ipl trophies wasim akram says)
महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)जर आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरूचा कर्णधार असता तर त्याने आतापर्यंत बंगळूरूला तीनचा चॅम्पियन बनवलं असतं, असे विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) केले आहे. वसीम अकरम पुढे म्हणतात की,आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगुळुरू ही टीम मला सर्वांत जास्त आवडते. या संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही आहे. बंगुळुरू तीनदा आय़पीएलचा फायनल सामना खेळली आहे, मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
हे ही वाचा : विराट कोहली-गौतम गंभीरला लाखोंचा दंड? पण, भरणार दुसरेच,’हा’ नियम बघा
विराट कोहली, एबी डिविलियर्स, क्रिस गेल, अनिल कुंबले, डेनियल विटोरी सारखे दिग्गज खेळाडू या संघातून आयपीएल खेळले आहेत. पण तरीही त्यांनी आयपीएल जिंकता आली नाही आहे. एकदाही आयपीएलची ट्रॉफी न जिंकताही बंगळुरूची फॅन फॉलोईंग खुप जबरदस्त आहे.बंगळुरूच्या टीमला खुप पसंत केले जाते त्यामुळे त्यांचे सामने पाहण्यासाठी खुप मोठी गर्दी जमते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अकरमने (wasim akram) स्पोर्ट्सकीडाशी बातचीत केली. या चर्चेत धोनी आरसीबीचा कर्णधार असता, तर काय झालं असतं? आरसीबीने तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती.आरसीबीकडे विराट कोहली (Virat Kohli) सारखा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पण तरीही त्यांना एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. धोनी असतात तर ते आतापर्यंत जिंकले असते.










