विजय हजारे ट्रॉफी : आदित्य तरेचं नाबाद शतक, मुंबईला विजेतेपद
आदित्य तरेचं धडाकेबाज शतक आणि कॅप्टन पृथ्वी शॉच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने उत्तर प्रदेशावर ६ विकेट राखून मात केली. विजयासाठी मिळालेलं ३१३ रन्सचं टार्गेट मुंबईने पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेच्या इनिंगच्या जोरावर सहज पूर्ण केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत मुंबईचा संघ एकही सामना हरलेला नाही. […]