"किंग कोहली 18 वर्ष...", RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विजय माल्याचं ट्वीट, काय म्हणाला?
माल्याने आपल्या पोस्टमध्ये आरसीबीच्या यशाचं कौतुक केलं. संघाची रचना, आक्रमक खेळशैली आणि उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सगळ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

RCB चा ऐतिहासिक विजय, विजय माल्याला आनंद

एक्सवर पोस्ट करत विराट आणि संघाचं कौतुक
RCB Wins IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) ने 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 ची ट्रॉफी जिंकली आहे. या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, आरसीबीचे माजी मालक विजय माल्या याने X वर एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. कर बुडवून विदेशात पळालेल्या विजय माल्ल्या याच्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा >> 15 तोळे सोनं, स्कोडा आणि चांदीची भांडी आणि वैष्णवीसारखाच छळ... पुण्यात पुन्हा तोच प्रकार
माल्याने आपल्या पोस्टमध्ये आरसीबीच्या यशाचं कौतुक केलं. संघाची बांधणी, आक्रमक खेळ आणि उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सगळ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. “ई साला कप नमदे!” असं कॅप्शन देण्यात आलं. जो आरसीबीच्या उत्साही चाहत्यांचं प्रतीक आहे. माल्याने आरसीबीच्या स्थापनेत आपली भूमिका आणि बेंगळुरूत आयपीएल ट्रॉफी आणण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
माल्याने कोहलीबद्दल काय म्हटलं?
माल्याने आरसीबीच्या दिग्गज खेळाडूंच्या योगदानाचा उल्लेख केला. विजय माल्याने विराट कोहलीचंही विशेष कौतुक केलं. विराटला तरुणपणात संघासाठी निवडलं होतं. “किंग कोहलीचे 18 वर्षे आरसीबीसोबत राहणं ही उल्लेखनीय बाब आहे,” असं ते म्हणाले. तसंच, “युनिव्हर्स बॉस” ख्रिस गेल आणि “मिस्टर 360” एबी डिव्हिलियर्स यांचंही त्यानं कौतुक केलं.
हे ही वाचा >> निराधार योजनेसाठी पत्नीने मृत दाखवलं, तो पती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात...जालन्याचं प्रकरण काय?
“आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आयपीएल ट्रॉफीचे हकदार आहेत,” असं माल्या म्हणाला. आपले स्वप्न साकार झालं म्हणत माल्याने सर्वांचे आभार मानले. हा विजय बंगळुरूसाठी ऐतिहासिक क्षण आहे. प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. “ई साला कप बेंगलुरू बारुते!” असं माल्याने पोस्टमध्ये म्हटलंय.