WPL: सलग पाच पराभवानंतर विजय, RCB सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL), प्रथमच आयोजित केली गेली आहे. आता स्पर्धा त्याच्या प्लेऑफ (Playoff ) सामन्यांकडे वाटचाल करत आहे. गुजरात जायंट्सचा (GG) पराभव करून, मुंबई इंडियन्स (MI) ने या मोसमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे आणि यासह त्यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता उर्वरित संघांचे काय होणार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (RCB can reach the final even after losing five matches in a row, what is the equation?)

महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण पाच संघ आहेत, त्यापैकी पॉइंट टेबलमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. क्रमांक-2 आणि क्रमांक-3 क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर सामना असेल, तर हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

अंतिम फेरी गाठण्याचे समीकरण काय?

14 मार्चपर्यंतची परिस्थिती पाहिल्यास मुंबई इंडियन्स 10 गुणांसह अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच हे दोन्ही संघ आता थेट फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत आहेत. WPL मध्ये प्रत्येक संघाला 8-8 सामने खेळावे लागतात, अशा परिस्थितीत जो संघ अव्वल असेल तो अंतिम फेरीत जाईल. जर आपण इतर संघांचे समीकरण पाहिले तर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स पॉइंट टेबलमध्ये नंबर-3 आणि नंबर-4 वर आहेत, त्यामुळे या संघांना टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. पण पाच पैकी पाच पराभव पत्करलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अडचणी आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

आरसीबी पात्र ठरू शकेल का?

RCB चे अजून तीन सामने बाकी आहेत, जर त्याने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण 6 गुण होतील. मात्र तरीही त्यांना इतर संघांच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघांनी त्यांचे उर्वरित सामने जिंकल्यास आरसीबीला फायदा होऊ शकतो. कारण अशा स्थितीत गुजरात-यूपीचा पराभव होईल आणि आरसीबीला पुढे जाण्याची संधी मिळेल.

ADVERTISEMENT

जर आरसीबीने शेवटचे तीन सामने जिंकले तर… 8 सामने, 3 विजय, 5 पराभव, एकूण गुण 6

गुजरातचा यूपीसोबतच्या सामन्यात विजय व्हायला हवा आणि बाकीच्या सामन्यात पराभव व्हायला हवा. त्यानंतरच समीकरणं जुळून येतील आणि याच गणितावर बरेच काही अवलंबून असल्याने आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, आम्ही आयपीएलमध्ये पाहिले आहे की परिस्थिती कशी बदलते आणि ते येथे देखील होऊ शकते.

ADVERTISEMENT

एलिमिनेटर : 24 मार्च शुक्रवार

फायनल : 26 मार्च रविवार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT