Ind vs NZ: रोहितलाही वाटलं असेल, माझ्यात गुणवत्ता नाही, संघातील बदलांवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रीया

मुंबई तक

न्यूझीलंडविरुद्ध सामना गमावलेल्या टीम इंडियावर सध्या चहुबाजूंनी टीकेचा वर्षाव होतो आहे. भारतीय संघाने या सामन्यात दोन महत्वाचे बदल केले. इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. इशान किशनला स्थान देण्यात आल्यामुळे अनेकांनी रोहित आणि इशान हे सलामीला फलंदाजीसाठी येतील असा अंदाज बांधला होता. परंतू कोहली आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने इशान किशन आणि लोकेश राहुल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

न्यूझीलंडविरुद्ध सामना गमावलेल्या टीम इंडियावर सध्या चहुबाजूंनी टीकेचा वर्षाव होतो आहे. भारतीय संघाने या सामन्यात दोन महत्वाचे बदल केले. इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. इशान किशनला स्थान देण्यात आल्यामुळे अनेकांनी रोहित आणि इशान हे सलामीला फलंदाजीसाठी येतील असा अंदाज बांधला होता.

परंतू कोहली आणि टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने इशान किशन आणि लोकेश राहुल यांना सलामीला पाठवत सर्वांना धक्का दिला.

T20 World Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडिया अजुनही शर्यतीत, ही आहेत समीकरणं

टीम इंडियाची ही रणनिती चांगलीच फसली. इशान किशन, लोकेश राहुल, रोहित शर्मा हे सर्व फलंदाज न्यूझीलंड गोलंदाजांच्या जाळ्यात अलगद अडकले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या या बदलांवर टीका केली आहे.

बॅटींग ऑर्डरमध्ये बदल करुन टीम इंडियाने एका अर्थाने रोहित शर्माला दाखवून दिलं की आम्ही ट्रेंट बोल्टच्या लेफ्ट आर्म बॉलिंग खेळण्यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, गावसकर इंडिया टुडेशी बोलत होते.

‘We were not brave enough’, विराट कोहलीच्या वक्तव्यावर कपिल देव भडकले, म्हणाले…

“इशान किशन हा hit or miss प्रकारातला खेळाडू आहे. जर त्याच्यासारख्या फलंदाजाला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं असतं तर चांगलं ठरलं असतं. त्यावेळी तो सामन्याच्या गरजेप्रमाणे खेळू शकला असता. आता इथे असं झालं की टीम इंडियाने रोहित शर्माला सांगितलं की ट्रेंट बोल्टची लेफ्ट आर्म बॉलिंग खेळण्यासाठी आमचा तुझ्यावर विश्वास नाही. जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सलामीला येणाऱ्या खेळाडूसोबत असं करत असाल तर त्याच्याही मनात शंका येईल की आपल्यात ती गुणवत्ता आहे की नाही?”

इशान किशनने सलामीला येऊन ७०-८० धावा केल्या असत्या तर त्याचं साहजिकचं कौतुक केलं असतं. परंतू तुमची रणनिती ही सपशेल फसली, त्यामुळे तुमच्यावर टीका ही होणारच असंही गावसकरांनी टीम इंडियाला सुनावलं.

BLOG : शेवट गोड व्हावा असं विराटलाच वाटत नसावं !

हे वाचलं का?

    follow whatsapp