Ind vs Aus: गिल, सूर्या फ्लॉप, भारताचा दारुण पराभव; कोण आहे मॅचचा दोषी?

मुंबई तक

Ind vs aus 2nd One day : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विशाखापट्टणम वनडेत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेत चिवट विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. हा पराभव भारतीयांना स्मरणात राहणार आहे कारण हा भारताचा एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे, जो घरच्या मैदानावर झाला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Ind vs aus 2nd One day : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विशाखापट्टणम वनडेत टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेत चिवट विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. हा पराभव भारतीयांना स्मरणात राहणार आहे कारण हा भारताचा एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे, जो घरच्या मैदानावर झाला आहे. (Gill, Surya flop, India’s crushing defeat; Who is the culprit of the match?)

विशाखापट्टणममध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 117 धावा केल्या. टीम इंडिया अवघ्या 26 षटकांत गडगडली, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला आणि सामना 234 चेंडू शिल्लक असताना संपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ क्रिकेटर भारताचा जावई

या पराभवाचा दोषी कोण?

शुभमन गिल– दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिलला पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 20 धावा करता आल्या, तर दुसऱ्या वनडेत त्याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे, पण शुभमनला ते टीम इंडियाला मिळवून देता आले नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमनची विकेट पडल्यानंतरच टीम इंडियाच्या विकेट्सना गळती लागली.

हे वाचलं का?