IPL 2021 : मॉर्गनविरुद्ध झालेल्या वादावर आश्विनचं स्पष्टीकरण, म्हणाला…

मुंबई तक

IPL च्या चौदाव्या हंगामात शारजाहच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात आश्विन आणि कोलकात्याचा कॅप्टन मॉर्गममध्ये भर मैदानात चांगलीच खडाजंगी झाली. हा वाद वेळेतच मिटला असला तरीही मैदानाबाहेर याचे पडसाद उमटणं सुरु आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांसह अनेक माजी खेळाडूंनी या वादासाठी आश्विनला जबाबदार धरत त्याच्या वागण्यामुळे खेळभावनेला तडा गेल्याचं म्हणलं. या वादावर आश्विनने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

IPL च्या चौदाव्या हंगामात शारजाहच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात आश्विन आणि कोलकात्याचा कॅप्टन मॉर्गममध्ये भर मैदानात चांगलीच खडाजंगी झाली. हा वाद वेळेतच मिटला असला तरीही मैदानाबाहेर याचे पडसाद उमटणं सुरु आहे.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांसह अनेक माजी खेळाडूंनी या वादासाठी आश्विनला जबाबदार धरत त्याच्या वागण्यामुळे खेळभावनेला तडा गेल्याचं म्हणलं. या वादावर आश्विनने आता ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलंय.

जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं, त्या सामन्यावेळी??

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १९ व्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर केकेआरचा खेळाडू राहुल त्रिपाठीने थ्रो फेकला. त्याने फेकलेला चेंडू पंतला लागून दूर गेला. यानंतर अश्विन-पंत अतिरिक्त रनसाठी धावले. केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या म्हणण्यानुसार मॉर्गनला ही गोष्ट पटली नाही. त्यानंतर साऊदीने आश्विनला बाद केले आणि अश्विन पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन आश्विनला उद्देशून काहीतरी बोलला, ज्यानंतर अश्विन रागाने मॉर्गनच्या दिशेने जाऊ लागला. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर कार्तिकने हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.

हे वाचलं का?

    follow whatsapp