Tokyo Olympic Explainer : तिरंदाजीत दक्षिण कोरिया कसं गाजवतं एकहाती सत्ता? काय आहे त्यांच्या यशामागचं रहस्य?
टोकिय़ो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात आतापर्यंत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आहे. भारताकडून या स्पर्धेत प्रवीण जाधव, अतानू दास, दिपीका कुमारी, तरुणदीप रॉय हे खेळाडू सहभागी झाले होते. परंतू दिपीका कुमारी आणि अतानू दास यांच्या रुपाने भारताचं आव्हान या स्पर्धेत कायम राहिलं आहे. परंतू प्रत्येक प्रकारात दक्षिण कोरियाचे खेळाडू आपली छाप पाडत पदकांच्या दिशेने आगेकूच […]
ADVERTISEMENT

टोकिय़ो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात आतापर्यंत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आहे. भारताकडून या स्पर्धेत प्रवीण जाधव, अतानू दास, दिपीका कुमारी, तरुणदीप रॉय हे खेळाडू सहभागी झाले होते. परंतू दिपीका कुमारी आणि अतानू दास यांच्या रुपाने भारताचं आव्हान या स्पर्धेत कायम राहिलं आहे. परंतू प्रत्येक प्रकारात दक्षिण कोरियाचे खेळाडू आपली छाप पाडत पदकांच्या दिशेने आगेकूच करत आहेत.
तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरिया एकहाती सत्ता कशी गाजवतो याची एक छोटीशी झलक. २०१६ साली रिओ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दक्षिण कोरियाने महिला-पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा चारही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. ऑलिम्पिकच्या इतिहासात दक्षिण कोरियाने तिरंदाजी या खेळात ३९ पदकं मिळवली असून यापैकी २३ सुवर्णपदकं आहेत.
१९८८ साली Seoul ऑलिम्पिक स्पर्धेत महिला तिरंदाजीचा समावेश झाला. त्यावेळपासून आतापर्यंत कोरियाचा संघ Women’s Recurve च्या प्रकारात बाजी मारत आला आहे. त्यामुळे कोरिअन खेळाडूंमध्ये असं नेमकं काय आहे की तिरंदाजी खेळात ते आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधीच देत नाहीत? जाणून घेऊयात…










