टीम इंडियाचा नवीन सिलेक्टर कोण?; आज होणार मुलाखती

मुंबई तक

टीम इंडियाचा पुढील मुख्य निवडकर्ता कोण असेल? हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता त्याचे उत्तर लवकरच सापडेल. अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती (CAC) 29 डिसेंबर रोजी मुंबईत नव्या राष्ट्रीय निवड समितीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआय मुलाखतीसाठी नावांची निवड करण्याच्या प्रक्रियेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टीम इंडियाचा पुढील मुख्य निवडकर्ता कोण असेल? हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता त्याचे उत्तर लवकरच सापडेल. अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती (CAC) 29 डिसेंबर रोजी मुंबईत नव्या राष्ट्रीय निवड समितीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआय मुलाखतीसाठी नावांची निवड करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि मागील निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा मध्य विभागातील सहकारी हरविंदर सिंगसह या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. नवीन मुख्य निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत व्यंकटेश प्रसाद, एस. शरथ, मनिंदर सिंग, मुकुंद परमार, नयन मोंगिया, सलील अंकोला आदी नावांचा समावेश आहे. यासोबतच सध्याचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनीही या पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “जर सर्व काही ठीक झाले तर सीएसीची बैठक 29 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. यामध्ये निवड झालेल्या नावांची मुलाखतही घेतली जाणार आहे. दरम्यान, चेतन आणि त्याच्या समितीला आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते. यादरम्यान त्याला रणजी ट्रॉफी सामन्यांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

चेतन शर्माची पुन्हा होणार का निवड?

चेतन आणि त्यांचे सहकारी हरविंदर हे तामिळनाडूविरुद्धचा सामना पाहण्यासाठी दिल्लीत होते, तर सुनील जोशी आसाम आणि हैदराबाद यांच्यातील सामना पाहण्यासाठी हैदराबादमध्ये होते. ‘त्यांना या फेरीचे सामने पाहण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली होती,’ सूत्राने सांगितले की, चेतन आणि हरविंदर या दोघांचीही सीएसीकडून पुन्हा मुलाखत घेतली जाण्याची शक्यता आहे आणि दोघांनाही आपापल्या भागात पाठवले जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp