T20 World Cup 2021 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, कोणाची लागणार वर्णी?
मुंबई: टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी भारतीय संघाची बुधवारी (8 सप्टेंबर) घोषणा केली जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियाची घोषणा केली जाईल. या दरम्यान, सिलेक्टर्स कर्णधार विराट कोहलीशी देखील चर्चा करतील. विराट या बैठकीला मँचेस्टरहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह (निवड […]
ADVERTISEMENT

मुंबई: टी-20 वर्ल्ड कप 2021 साठी भारतीय संघाची बुधवारी (8 सप्टेंबर) घोषणा केली जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियाची घोषणा केली जाईल. या दरम्यान, सिलेक्टर्स कर्णधार विराट कोहलीशी देखील चर्चा करतील. विराट या बैठकीला मँचेस्टरहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह (निवड समितीचे संयोजक) हे देखील या महत्त्वाच्या बैठकीचा भाग असतील.
टी-20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 10 सप्टेंबरपर्यंत आपला संघ जाहीर करावा लागणार आहे. बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करणार आहे. याशिवाय, राखीव म्हणून पाच खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ही फक्त 15 खेळाडूंचा खर्च उचलणार आहे. तर राखीव खेळाडूंचा खर्च संबंधित क्रिकेट बोर्डाला उचलावा लागणार आहे.
भारतीय संघात कोणाची वर्णी लागणार?
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर युवा यष्टीरक्षक इशान किशनने भारतासाठी काही चांगली खेळी खेळली. अशा परिस्थितीत ईशान किशनला संजू सॅमसनपेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांनाही संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे.