मुंबईची खबर : मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट

मुंबई-गोवा एक्स्प्रेसवरील रखडलेली कामे आता जलद गतीने पूर्ण केली जात असून माणगाव आणि इंदापूर बायपासजवळील काम वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत याबाबत सांगितलं.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट

मुंबई तक

• 04:03 PM • 04 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार...

point

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट

Mumbai News: मुंबई-गोवा एक्स्प्रेसवरील रखडलेली कामे आता जलद गतीने पूर्ण केली जात असून माणगाव आणि इंदापूर बायपासजवळील काम वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता मुंबई-गोवा हायवे (NH-66) च्या उर्वरित भागांचं काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत याबाबत सांगितलं. नेहमीप्रमाणे, मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. पुढील गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक मंत्र्यांनी दिलं. 

हे वाचलं का?

आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा एक्स्प्रेसवेच्या अपूर्ण बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या हायवेचं काम बऱ्याच काळापासून सुरू असून त्यानंतर अटल सेतू आणि समृद्धी महामार्गासारखे मोठे प्रोजेक्ट्स सुद्धा पूर्ण झाल्याचं डावखरे यांनी म्हटलं. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलाचं काम एका नवीन एजन्सीद्वारे केलं जात असून आणि त्याचं काम योग्यरित्या सुरू आहे. 

हे ही वाचा: Govt Job: BSNL मध्ये मोठ्या पदांची भरती! फ्रेशर्स उमेदवारांना देखील मिळेल तगडा पगार अन्...

सार्वजनिक मंत्र्यांनी दिली माहिती... 

भोसले यांच्या माहितीनुसार, या प्रोजेक्टमध्ये माणगाव आणि इंदापूर बायपाससह तीन रेल्वे फ्लायओव्हर आणि दोन मोठ्या पुलांचा समावेश आहे. हे काम जुलै 2025 मध्ये सुरू झालं असून ते 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. संबंधित कंत्राटदार योग्यरित्या काम करत नसल्याने, काम एका नवीन एजन्सीकडे ट्रान्सफर करण्यात आलं आहे. ते असंही म्हणाले की, कोकणात गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी पाहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचं पावसाळ्यापूर्वी मे महिन्यापर्यंत माणगाव-महाड रस्त्यावरील ताम्हिणी घाट बायपास पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. 

हे ही वाचा: महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

दरम्यान, रायगड जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अलिबाग-रोहा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुरूच आहे. येणाऱ्या सुट्ट्या आणि सणांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अलिबाग-रोहा मार्गावर या कोंडीमुळे जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचं चित्र दिसून येतं. अलिबाग-रोहा मार्गावर कुरुळ ते सुडकोली, कुरुळ-आक्षी ते रेवदंडा तसेच रेवदंडा बायपास रस्त्यावर रस्ते, क्रॉस ड्रेन आणि सीवरेजचे काम सुरू आहे. रायगड जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जड वाहनांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला असून आदेशाला न जुमानता वाहने सुरूच राहिली.

    follow whatsapp