Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची बॅटिंग सुरुच, अंधेरी सबवे बंद; IMD चा महत्त्वाचा इशारा

मुंबई तक

01 Jul 2026 (अपडेटेड: 01 Jul 2026, 12:02 PM)

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. आयएमडीने मुंबईसह परिसरासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Mumbai Rain Update

Mumbai Rain Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची बॅटिंग सुरुच

point

अंधेरी सबवे बंद, IMD चा महत्त्वाचा इशारा

Mumbai Rain Update : मुंबईत मान्सूनने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील दिवसाची सुरुवात सातत्याने पावसाने होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असली तरी मुंबईतील लोकल रेल्वे सेवा मात्र नियमितपणे सुरू आहे. भारत हवामान विभागाने (IMD) अंधेरी, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील अनेक भागांसाठी पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बीड : पतीच्या 'त्या' त्रासाला वैतागली, वायरने गळा आवळून खून, हार्ट अटॅकचा बनाव

नागरिकांना धोकादायक भागांपासून दूर राहण्याचा सल्ला

सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे काही भागांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला आहे. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधेरी सबवे, मालाड, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड आणि कांजूरमार्ग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना धोकादायक भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा अंत

मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाने बुधवार, 1 जुलै रोजीही मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शहरात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसही अशीच हवामानाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 1 जुलैसाठी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मुंबईत मान्सून नेहमीच्या तारखेपेक्षा 13 दिवस उशिरा दाखल झाला होता. मात्र आता मान्सूनने धुमाकूळ घातला असून शहरातील जलाशयांमध्ये पाण्याची भर पडत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये 5 ते 6 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.