वैमानिकाला अंदाज आला आणि MAYDAY मेसेज नियंत्रण कक्षाला दिला, घटनेचं कारण कळलं?

लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारं एअर इंडियाचे बोइंग 787 विमान  टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच विमानतळ परिसराबाहेर कोसळलं.

Mumbai Tak

मुंबई तक

12 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 06:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एअर इंडियाचं विमान कोसळलं, अहमदाबादेत मोठी दुर्घटना

point

242 जणांना घेऊन लंडनकडे निघालं होतं विमान

point

वैमानिकाने दिला होता MAYDAY कॉल

Ahmedabad Plane Crash : गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारं एअर इंडियाचे बोइंग 787 विमान  टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच विमानतळ परिसराबाहेर कोसळलं. विमानात 242 प्रवासी सवार होते. 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू यांचाही यात समावेश आहे. अपघातापूर्वी वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला 'मेडे कॉल' पाठवून धोक्याची सूचना दिली होती, पण त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGC) नुसार, विमानाने दुपारी 1:39 वाजता रनवे 23 वरून उड्डाण केले होते. टेकऑफनंतर लगेचच वैमानिकाने 'मेडे कॉल' दिला.  आपत्कालीन परिस्थिती दर्शवण्यासाठी हा संदेश वापरला जातो. यानंतर विमानाकडून एटीसीला कोणताही सिग्नल मिळाला नाही आणि काही सेकंदातच विमान विमानतळ परिसराबाहेर कोसळलं. विमान कॅप्टन सुमित साभरवाल आणि आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर चालवत होते. सुमित यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाइव कुंदर यांना 1100 तासांचा अनुभव आहे.

हे ही वाचा >> Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!

'मेडे कॉल' म्हणजे काय?

हवाई वाहतूक क्षेत्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही विशिष्ट संदेश असतात.  'मेडे कॉल' हा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संदेश आहे. विमान गंभीर संकटात असताना आणि प्रवासी किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना हा संदेश प्रसारित केला जातो. इंजिन निकामी होणं, विमानाला आग लागणं, हवेत विमान एखाद्या गोष्टीला धडक होण्याचा धोका किंवा अपहरणासारख्या परिस्थिती. हा कॉल रेडिओवर तीन वेळा उच्चारला जाते—"Mayday, Mayday, Mayday"—जेणेकरून ही गंभीर परिस्थिती असल्याचं स्पष्ट होतं. 'मेडे' हा शब्द फ्रेंचमधील "m’aider"  (मदत करा) यावरून आला आहे. या कॉलनंतर एटीसी त्या विमानाला प्राधान्य देते आणि आपत्कालीन सेवा पुरवते. फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि रनवे रिकामा करुन लगेचच  त्या विमानासाठी सुविधा पुरवल्या जातात. तर थोडी कमी गंभीर परिस्थिती असेल, तर 'पॅन-पॅन' कॉलचा वापरला जातो. 

अपघातानंतरची परिस्थिती

हे ही वाचा >> मोठी बातमी: 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं, अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात

डीजीसीए आणि संबंधित पथकं घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अद्याप प्रवासी आणि क्रूच्या स्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा अपघात विमानन सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करतो. तांत्रिक बिघाड झाली की, मानवी चूक झाली हे स्पष्ट झालेलं नाही.

    follow whatsapp