Kalyan News : शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या विरोधात विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या या निर्णायाविरोधात राज्यात संतापाची लाट आहे. हा मराठी भाषेवरील अन्याय असल्याचे म्हणत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अशातच तळोजा ते कल्याण मुंबई महाप्रदेश विकास प्राधिकरण दरम्यान सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्प कामादरम्यान एक अतिशय धक्कादायक प्रकार उघड झलाय. मराठी मुलांनाच कामावरून काढून टाकण्याची कंत्रादराने धमकी दिली आहे. मराठी मुलांना कामावरून काढल्यानंतरच थकलेला पगार देण्यात येईल असे कंत्राटदराने म्हटलं आहे. हा सर्व प्रकर मराठी माणसाच्या महाराष्ट्रात घडत असलेलं वास्तव आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पन्नास लाख रुपये देऊन सासरच्यांनी सूनेचा छळ केला, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर
मराठी कामगारांचे पगात थकीत
मागील काही महिन्यांपासून कल्याण ते तळोजा दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पात काम करणाऱ्यांचे पगार थकीत आहेत. शिव जनरल कामगार सेनेन याप्रकरणी हस्तक्षेप केला. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. हे सुरक्षारक्षक हरियाणातील गवार कंपनीच्या माध्यमातून काम करत आहेत. या ठिकाणी अनेक मराठी भाषिक मुले सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या कामागारांना वेतन देण्यात आलेलं नाही. यावेळी त्यांनी थकीत पगाराबाबत विचारले असता, सुपरवायझरने हरियाणातील व्यवस्थापकीय संचालकाला फोनद्वारे संपर्क साधत संचालकांनी मराठी मुलांना कामावरून काढल्यावरच पगार देण्यात येईल असं सांगितलं.
हेही वाचा : धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?
मराठी कामगारांना आर्थिक त्रासाला बळी पडावं लागलं
व्यवस्थापकीय संचालकाशी बोलताना हरीश इंगळे यांनी फोनकॉल रेकॉर्ड केला. कंपनीच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयाने मराठी कामगारांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला बळी पडावं लागेल. थेट गवार कंपनीच्या संचालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मराठी कामगारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे हिंदीसक्ती करून मराठी कामगारांवरच दबाव टाकण्याचं काम सुरु आहे.
ADVERTISEMENT
