सिन्नर: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आता त्याच चाकणकरांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी जोरदार निशाणा साधला आहे. खरात या गुरूवर शोषणाचे गंभीर आरोप समोर आल्यानंतरही त्यांना पाठिंबा देण्याच्या चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल तृप्ती देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “एखादा गुरू करणं, त्याला नतमस्तक होणं यात वाईट काहीच नाही, पण तो चुकीचं काही करत असेल आणि हे तुम्हाला माहीत असेल तर त्याला पाठिशी घालण्याचं काम तुम्ही का केलं?” असा थेट सवाल करत तृप्ती देसाई यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
ADVERTISEMENT
'रुपाली चाकणकर खरातला पप्पा म्हणायचा...'
तृप्ती देसाई यांनी आज (24 मार्च) सिन्नरमधील मिरगाव येथे जाऊन ईशान्येश्वर मंदिराची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा-जेव्हा खरातच्या प्रकरणातील खरे विषय समोर आले, तेव्हा रूपाली चाकणकर यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एकदाही विचारलं नाही की, शोषण झालंय का? अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत तर खरातने खरंच हे केलंय का? याची चौकशी का केली नाही?” असं म्हणत त्या पुढे म्हणाल्या की, ''चाकणकर यांनी ट्रस्टवर राहायचं की नाही याचा विचारही केला नाही. त्या एवढ्या आहारी गेल्या होत्या की, माझ्या माहितीप्रमाणे त्या खरातला ‘पप्पा’ म्हणायच्या. आणि मग जे ‘पप्पा’ आहेत तुमचे, त्या पप्पाने काही केलं तरी चालतं का?” असा थेट सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा>> भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!
तृप्ती देसाई यांनी आरोप केला की, चाकणकर यांचा प्रयत्न ‘पप्पा’ना वाचवण्याचा आहे. “आता पप्पांना भेटायला तुम्ही जेलमध्ये येणार आहात का? तुम्ही सोयीचं राजकारण करू नका. महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे,” असं म्हणत त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेला ‘सोयीचं राजकारण’ म्हटलं.
रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ?
तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केलं की, त्यांचं एकच टार्गेट होतं आणि आहे, ते म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल करणं आणि खरातला बेड्या पडणं आणि आता खरातला शिक्षा होणं व पीडितांना न्याय मिळणं..
हे ही वाचा>> '8 महिलांचे 35 व्हिडिओ, अशोक खरातने भोंदूगिरी करून महिलांवर केले बलात्कार', फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
“कोणी आरोप केले, प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचं एकच टार्गेट होतं की, यामध्ये गुन्हा दाखल होणं, खरातला बेड्या पडणं आणि आता एकच टार्गेट आहे की, खरातला शिक्षा होणं आणि पीडितांना न्याय मिळणं,” असं ठाम मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं. चाकणकर यांनी खरातला ‘पप्पा’ म्हणून संबोधल्याचा मुद्दा उपस्थित करत त्या म्हणाल्या की, अशा आंधळ्या भक्तीमुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडथळे येतात.
ही टीका नव्या वादाला जन्म देणारी ठरली आहे. रूपाली चाकणकर यांनी अद्याप या विधानावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, खरात प्रकरणात शोषणाचे आरोप गंभीर असल्याने आणि त्यावर पोलीस तपास सुरू असल्याने, तृप्ती देसाई यांच्या या टीकेने चर्चेला उधाण आलं आहे.
तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महिलांच्या न्यायासाठी आवाज उठवला असून, त्यांच्या या विधानाने चाकणकर यांच्या भक्तीला आणि राजकीय भूमिकेबाबत नव्याने सवाल उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT











