viral story : प्रेम विवाह करणाऱ्यांना दोघांच्याही घरातून अनेकदा विरोध होतोच. अशा प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केल्या जातात. प्रेमी युगुलकांचा पोलीस पाठलाग करतात. मात्र वास्तवात दोन जोडप्यांबाबत भलतंच घडलं आहे. एका जोडप्याला लग्नासाठी घरातून विरोध केला जात होता. मात्र, पोलिसांनी पोलीस ठाणे परिसरातील एका मंदिरात लग्न लावून दिलं आहे. ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजप नेत्याच्या लेकाचा प्रताप; एक दोन नाही, तर तब्बल 130 पॉर्न व्हिडिओज्...
पोलिसांनी दिलं जोडप्याचं लग्न लावून
नातेवाईकांनी दोघांनाही लग्नासाठी विरोध दर्शवला होता. अशावेळी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जोडप्याचं लग्न लावून दिलं. कनिष्का तिवारी असं महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तसेच इतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती. या अगळ्यावेगळ्या विवाहाची एकच चर्चा होताना दिसत आहे.
नवऱ्या मुलाचं नाव हे पिंटू साह असे आहे. तो मूळचा सिकरोल जिल्ह्यातील रेंका गावातील रहिवासी आहे. तर नवरी मुलीचं नाव शिल्पी कुमारी आहे. या दोघांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांची ओळख रेंकामधील एका लग्नसमारंभात झाली होती. त्यानंतर त्यांचं रुपांतर हे प्रेमात झालं. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.
कुटुंबियांकडून लग्नाला विरोध
या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळताच, त्यांनी या नात्याला विरोध केला. त्यानंतर त्या दोघांच्या भेटीगाठीस विरोध करण्यात आला. यानंतर या जोडप्याने महिला पोलीस ठाणे गाठलं आणि पोलीस अधिकाऱ्यांना विवाह लावून देण्याची विनंती केली. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील एका मंदिरात जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे.
हेही वाचा : आधी गोळी मारली नंतर गळा चिरला अन् प्रेत दिलं नदीत फेकून, भाऊच का झाला भावाचा वैरी?
अखेरपर्यंत दोघांच्याही कुटुंबियांनी या नात्याला आणि विवाहाला विरोध केला होता. त्यानंतर ते संतापून तिथून निघून गेले होते. मात्र, पोलिसांनी हे लग्न लावून दिलं आहे.
ADVERTISEMENT
