मुंबई Tak बैठक : "सुरज चव्हाणने काय येऊ नये इंडस्ट्रिजमध्ये? बाकीचे लोक कोण ठरवणारे इंडस्ट्रिमध्ये यायचं की नाही? तुम्ही पण रील बनवताच की, सर्वांना संधी मिळावी, सर्वांना यश मिळालं पाहिजे, असं अभिनेते जितेंद्र जोशी म्हणाले. मर्दिनी या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी, श्रेयश तळपदे, प्रार्थना बेहरे आले होते, त्यांनी मुंबई तकला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत जितेंद्र जोशी यांनी मोठं भाष्य केलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai Tak Baithak 2026 Schedule: महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने.. काय असणार विकासाचा अजेंडा? ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिग्गजांचं व्हिजन
जितेंद्र जोशी काय म्हणाले?
मुंबई तकशी बोलताना, त्यांनी रीलस्टार सुरज चव्हाणबाबत सांगितलं की, का सुरज चव्हाण यांनी काम करू नये? बाकीचे ठरवणारे कोण? या ठिकाणी काहींना अभंगाची गरज असते, तसेच अनेकांना आनंद शिंदे यांच्या गाण्याची देखील तितकीच आवड असते, फक्त अंभगाचं ठिकाण आणि गरज वेगळी असते, तसेच आनंद शिंदे यांच्या गाण्याची गरज आणि ठिकाण वेगळं असतं.
देऊळ बंद सिनेमाचं केलं कौतुक
सर्वांनी सर्व काही पाहिलं पाहिजे, आता देऊळ बंद बघा प्रवीणचं खरंच कौतुक आहे. तो नुसता पळतोय, कुठे कुठे कोपरगाव म्हणू नका आणि लोक पण चांगला प्रतिसाद देतात. राजा शिवाजीसारखा, तुंबाडची मंजुळासारखे मराठी सिनेमे हाऊसफुल होतात, असं म्हणत त्यांनी मराठी सिनेमाचं कौतुक केलं.
हे ही वाचा : बायकोचा सासरी जाण्यास नकार, जावयानं मेहुणीला पळवलं अन् भयंकर घडलं
नंतर त्यांनी पुढे सांगितलं की, मी पोलीस भूमिका खूप केलेल्या आहेत. मी कुठे गेलो तर काही पोलीस मला सल्युट करतात, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT











