अवघड झालंय! आईने मोबाईल हिसकावला म्हणून 10 वर्षाच्या मुलानं घेतली फाशी

मुंबई तक

26 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:01 AM)

उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. आईने रागावल्याने मुलाने हे धाडसाचे पाऊल उचलले. पोलिसांनी मार्ग प्रस्थापित करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लखनौच्या हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागातील हे प्रकरण आहे. खरं तर, पतीच्या निधनानंतर, कोमल (40) तिचा मुलगा आरुष (10 वर्षे) आणि मुलगी […]

Mumbai Tak
Google CTA

उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. आईने रागावल्याने मुलाने हे धाडसाचे पाऊल उचलले. पोलिसांनी मार्ग प्रस्थापित करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लखनौच्या हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागातील हे प्रकरण आहे. खरं तर, पतीच्या निधनानंतर, कोमल (40) तिचा मुलगा आरुष (10 वर्षे) आणि मुलगी विदिशा (12 वर्षे) सोबत तिच्या वडिलांच्या घरी राहते.

हे वाचलं का?

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आरुष अनेक दिवसांपासून शाळेत जात नव्हता. त्याच वेळी तो दिवसभर घरात मोबाईल गेम खेळत असे. त्यामुळं त्याला अनेकदा समजावूनही सांगण्यात आले. दरम्यान, घटनेच्या दिवशी आईने मुलाला मारून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि निघून गेली, अशी माहिती मिळतेय.

गळफास लावून केली आत्महत्या

त्याचवेळी रागाच्या भरात आरुषने बहिण विदिशा हिला खोलीबाहेर पाठवून दार बंद केले. बराच वेळ आतून मुलाचा आवाज न आल्याने घरच्यांनी त्याला हाक मारली, मात्र आवाज न आल्याने दरवाजा तोडला असता आरुष लटकत असल्याचं दिसलं. त्याला घाईघाईत खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डीसीपी सेंट्रल झोन अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आत्महत्या केली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलगा मोबाईलवर गेम जास्त खेळत असे आणि आई त्याला खडसावायची. याचा राग आल्याने त्यानं हा पाऊल उचलला.

ऑनलाईन गेमच्याबाबतीत केंद्र सरकार आणणार कायदा

विशेष म्हणजे ऑनलाइन गेमिंगचा समाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार योग्य धोरण किंवा नवीन कायदा आणणार आहे, असं कळतंय. रेल्वे, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली होती. वैष्णव म्हणाले की अलीकडेच त्यांनी सर्व राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांसोबत बैठक घेतली, त्यांना ऑनलाइन गेमिंगच्या परिणामाबद्दल चिंता होती.