इम्तियाज जलील आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?; टोपेंनी केला खुलासा

मुंबई तक

• 11:10 AM • 19 Mar 2022

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असून, तसा प्रस्ताव आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं. याविषयावरुन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांसह भाजपतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर भूमिका मांडली. जलील नेमकं काय म्हणाले, याबद्दल आता राजेश टोपेंनी सविस्तर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक असून, तसा प्रस्ताव आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं. याविषयावरुन महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांसह भाजपतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर भूमिका मांडली. जलील नेमकं काय म्हणाले, याबद्दल आता राजेश टोपेंनी सविस्तर भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “आमच्या नेहमीप्रमाणेच गप्पा होत्या. त्यात उत्तर प्रदेश आणि इतर विषयावर चर्चा होती. त्यावेळी मी असं म्हणालो की, उत्तर प्रदेशात एमआयएममुळे १० ते १५ जागा कमी झाल्या, असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे १० ते १५ जागा वाढल्या असत्या. तुम्ही असं का करता आहात? जातीयवादी पक्षांना मदत होईल, असं का वागता? तुमचं काय धोरण आहे? इतकंच मी त्यांना (इम्तियाज जलील) विचारलं.”

‘एमआयएम’ला राऊतांचा नकार, तर सुप्रिया सुळेंनी जलील यांच्या भूमिकेचं केलं स्वागत

“त्यावर ते (इम्तियाज जलील) म्हणाले की, ‘आमचं तसं काही म्हणणं नाही. आम्हाला अल्पसंख्याक समाजाचा विकास हाच आमचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही पक्षांकडून हे होत असेल, तर आम्ही ते करू,’ असं त्यांनी (इम्तियाज जलील) मला सांगितलं,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

“मी त्यांना (इम्तियाज जलील) विश्वास दिला की आम्ही सर्वजण अल्पसंख्याक बांधवांना सोबत घेऊनच काम करत आलो आहोत. विकास करत आलो आहोत. मौलाना अबुल आझाद महामंडळाची स्थापना केली. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर आग्रही असतो आणि प्रश्न सोडवतो. ते म्हणाले की, ‘अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षासोबत आम्ही कधीही येऊ शकतो.’ मी त्यांना सांगितलं की, तुमचं जे काही म्हणणं आहे, ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला बोला. इतकंच झालं. बाकी काहीही बोलणं झालेलं नाही,” असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

‘युतीसाठी आम्ही तयार आहोत…’, MIM कडून महाविकास आघाडी सरकारला मोठा प्रस्ताव

“गप्पातील हा विषय होता. त्यामुळे मला असं वाटतं की, याबाबतील ज्या काही गोष्टी असतात ते पक्षश्रेष्ठी ठरवते. आम्हाला तो अधिकार नसतो. आमच्या अनौपचारिक चर्चा झाली. यावर मला बोलण्याचा अधिकार देखील नाही. एमआयएमने यासंदर्भात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलावं. अल्पसंख्याक विभागाची काळजी घेणाऱ्या पक्षाला आम्ही साथ देऊ इतकंच ते म्हणाले. मी ऐकून घेतलं”, असंही टोपे म्हणाले.

    follow whatsapp