आता दोन वर्षावरील मुलांवर देखील कोरोना लसीची होणार चाचणी, भारत बायोटेकला मंजुरी

मुंबई तक

• 05:09 AM • 12 May 2021

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. पण तज्ज्ञांनी लवकरच तिसरी देखील लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचं म्हटलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता एक मोठं पाऊल उचलण्यात येत आहे. कोरोना लसीशी निगडीत सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC)ने मंगळवारी भारत बायोटेकच्या […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. पण तज्ज्ञांनी लवकरच तिसरी देखील लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचं म्हटलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता एक मोठं पाऊल उचलण्यात येत आहे.

हे वाचलं का?

कोरोना लसीशी निगडीत सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC)ने मंगळवारी भारत बायोटेकच्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हिसिनची चाचणी घेण्याची जी शिफारस केली होती तिला आता मंजूरी मिळाली असल्याचं समजतं आहे.

ही क्लिनिकल चाचणी 2 ते 18 वयोगटातील 525 लोकांवर केली जाणार आहे. जी दिल्ली एम्स, पाटणा एम्स आणि नागपूरच्या MIMS रुग्णालयात होईल. समितीच्या शिफारशीनुसार भारत बायोटेकला फेज 3 ची चाचणी सुरू करण्यापूर्वी फेज 2 चा संपूर्ण डेटा उपलब्ध करुन द्यावा लागेल.

SECने अशी शिफारस केली होती की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2, फेज 3 च्या क्लिनीकल चाचणीला मंजुरी दिली गेली पाहिजे. जी 2 ते 18 वयोगटातील मुलांवर केली जाईल.

भारतात आता सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरल्या जात आहेत. पण या दोन्ही लसी फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाच दिल्या जात आहेत. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसची निर्मिती करत आहे.

लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला म्हणजे तुम्ही घेतलेला पहिला डोस वाया गेला?

तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी दिला इशारा

भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर सुरु असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणाले होते की, तिसरी लाट येणार हे निश्चित आहे आणि त्याचा मुलांवर जास्त परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारकडे तिसर्‍या लाटेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने सवाल देखील केला होता की, तिसरी लाट आली तर मुलांचे काय होईल, त्यांच्या कुटुंबीयांचे काय होईल, लहान मुलांवर कसे उपचार केले जातील? या गोष्टींवर आत्तापासूनच विचार करण्याची गरज आहे.

भारताने 80 देशांना 6 कोटींपेक्षा जास्त Vaccines पाठवल्या, मोदींच्या निर्णयामुळे लस तुटवडा!

तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतर अनेक राज्यांनी मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय, विशेष कोव्हिड केअर सेंटर बांधण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे.

    follow whatsapp