Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण समोर, डॉक्टर म्हणाले…

मुंबई तक

• 04:55 AM • 05 Sep 2022

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर जवळ अपघाती निधन झाले. अपघातानंतर सायरस यांना कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी सांगितले की सायरस मिस्त्री यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. सायरस मिस्त्री रविवारी कारने अहमदाबादहून मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये […]

Mumbaitak
follow google news

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर जवळ अपघाती निधन झाले. अपघातानंतर सायरस यांना कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी सांगितले की सायरस मिस्त्री यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते.

हे वाचलं का?

सायरस मिस्त्री रविवारी कारने अहमदाबादहून मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये चार जण होते. त्यांची कार मुंबईजवळ एका दुभाजकावर आदळली आणि या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण रुग्णालयात दाखल आहेत.

सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. शुभम सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीला सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल या दोघांना रुग्णालयात आणण्यात आले होते. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात आणलं गेलं त्यावेळी दोघंही मृत अवस्थेत होते. सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात आणणाऱ्या स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचवेळी पंडोले यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यानंतर दुसरी रुग्णवाहिका दोन रुग्णांना घेऊन आली. दोघेही जखमी अवस्थेत होते. प्राथमिक उपचारानंतर दोघांना रेनबो रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर दोघांना विमानाने मुंबईला आणण्यात आले.

सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली होती – डॉक्टर

डॉ.शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याचवेळी जहांगीर यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले होते तसेच डोक्याला दुखापत झाली होती. यापूर्वी दोघांचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात होणार होते. यानंतर जिल्हाधिकारी आणि एसपींच्या आदेशानंतर, तज्ञांच्या सल्ल्यासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील म्हणाले की, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, ओव्हरस्पीडमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला.

एसपी म्हणाले ”मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी “ब्लाइंड स्पॉट” आहेत. हा मुद्दा ब्लाइंड स्पॉट निर्मूलन समितीसमोर मांडण्यात आला आहे. हे “ब्लाइंड स्पॉट्स” दूर करण्यासाठी NHAI कडेही संपर्क साधण्यात आला आहे.

महिला डॉक्टर चालवत होती गाडी

अनाहिता पंडोले (55 वर्षे) या सायरस मिस्त्री यांची कार चालवत होत्या. त्या एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. सायरस मिस्त्री आणि अनाहिता पंडोल यांच्याशिवाय त्यांचे पती दारियस पांडोले आणि भाऊ जहांगीर दिनशा पांडोळे हेही कारमध्ये होते. या अपघातात अनाहिता आणि तिचा पती डॅरियस थोडक्यात बचावले आहेत. यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर गुजरातमधील वापी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांना मुंबईला हलवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

मिस्त्री अहमदाबादहून परतत होते

सायरस मिस्त्री गुजरातमधील उडवाडा येथून परतत होते. पारशी समाजाच्या एका मोठ्या धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन ते येथे परतत होते. येथे इराणहून आणलेल्या आतश बेहराम यांचा पवित्र अग्नि आहे. जेव्हा संजन बंदराची स्थापना झाली तेव्हा पारशी लोकांनी ही आग येथे आणली होती. नंतर उदवाडा येथे अभिषेक करण्यात आला. उडवाडाच्या या इमारतीत आतश बेहराम यांना इराणशाह असेही म्हणतात. आतश बेहराम हे जगातील सर्वात जुने पवित्र अग्नि मानले जाते, जे सतत जळत असते.

पीएम नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

सायरस मिस्त्री यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, सायरस मिस्त्री यांचं अकाली निधन धक्कादायक आहे. ते भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे एक आश्वासक व्यापारी नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर एक तरुण, तेजस्वी आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची ओळख होती. हे खूप मोठे नुकसान आहे. माझ्या त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती संवेदना.

    follow whatsapp