crime news : बिहारच्या जमुई जिल्ह्यातील बरहट पोलीस ठाणे हद्दीतील नुमार गावात पती-पत्नीच्या वादानंतर बायको माहेरी गेली असता, पती मन्नू कुमार याने बुधवारी आणि गुरुवारी रात्री एका बंद खोली गळफास घेत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांना गुरुवारी सकाळी संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीसांना कळवण्यात आले. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण : बीडच्या मित्राने पीडितांचा व्हिडीओ शेअर केला, अन् अहिल्यानगरचे दोघं अडकले; SIT कडून अटक
नवरा-बायकोमध्ये काही गोष्टीवरून वाद
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे. घडलेल्या घटनेनुसार, नुमार गावातील रहिवासी गावातील रहिवासी कामेश्वर यादव यांचा वर्षीय मुलगा मन्नू कुमार (वय 20) याचे तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित होते, पण गेल्या काही दिवसांपासून त्या जोडप्यामध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला होता.
बंद खोलीत नवऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन
बुधवारी पती-पत्नीच्यात सतत वाद व्हायचा, ज्यामुळे बायको माहेरी गेल्याने संतापून पती मन्नू कुमारने, एका बंद खोलीत गळफास घेत जीवन संपवलं. संबंधित घटनेत सकाळी घरातील वादामुळे सदस्यांनी कुलूप लावलेली खोली उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा मन्नू फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
हे ही वाचा : 17 वर्षीय मुलीने प्रियकरासाठी आईलाच संपवले, बेडरुममध्ये पुरला मृतदेह; वर्षभरानंतर 'असं' बाहेर आलं प्रकरण
या घटनेत पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. संपूर्ण कुटुंबावर शोक व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांमध्ये अत्यंत दुःखी आणि शोककुल परिस्थिती निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT











