नवी मुंबई : नवरा घर सोडून गेल्याचा बनाव, प्रियकरासोबत राहायची, 11 महिन्यांनी पितळ उघड

मुंबई तक

14 Jul 2026 (अपडेटेड: 14 Jul 2026, 03:07 PM)

Navi Mumbai Crime News : पोलिसांनी नवी मुंबईतील 11 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा उलगडा करत मृताची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली. पतीची हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप दोघांवर आहे.

Navi Mumbai Crime News

Navi Mumbai Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबई : नवरा घर सोडून गेला

point

म्हणून प्रियकरासोबत राहिली, 11 महिन्यांनी पितळ उघड

Navi Mumbai Crime News,  नवी मुंबई : राबळे एमआयडीसी पोलिसांनी ऐरोलीच्या यादव नगर परिसरात सुमारे 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. पत्नीने प्रियकराची मदतीने नवऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात मृताची पत्नी सुनीता कुशवाहा (40) आणि तिचा कथित प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर सुनीताचा पती बलिराम सूर्यनाथ कुशवाहा (50) याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत जंगलात फेकल्याचा आरोप आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं 

स्थानिक न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बलिराम हा पत्नी आणि राहुल यांच्यातील कथित प्रेमसंबंधाला विरोध करत होता. याच कारणावरून दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

आरोपींनी मृतदेहाचे केले तीन तुकडे 

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट 2025 च्या रात्री ही घटना घडण्यापूर्वी दाम्पत्याच्या दोन्ही मुलांना त्यांच्या मावशीच्या घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर बलिराम झोपेत असताना त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर धारदार शस्त्राच्या साहाय्याने त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेहाचे तीन तुकडे केले. हे तुकडे वेगवेगळ्या गोण्यांमध्ये आणि चादरींमध्ये गुंडाळण्यात आले. त्यानंतर राहुलच्या ऑटोरिक्षामधून गावली देव टेकडीजवळील जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे अवशेष फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर सुनीता आपल्या मुलांना घेऊन घणसोली येथे राहायला गेली आणि राहुलसोबत राहू लागली. दरम्यान, बलिराम घर सोडून निघून गेल्याचे सांगून परिसरातील लोकांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे बराच काळ या प्रकरणाचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र, बलिरामचा भाऊ त्याचा शोध घेत असताना एप्रिल 2026 मध्ये त्याने राबळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल क्रमांकांमधील बदल आणि दोन्ही आरोपींच्या जबाबांतील विसंगती यांचा आधार घेत चौकशी अधिक तीव्र केली. स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या चौकशीत दोन्ही आरोपी कथितपणे खचले आणि संपूर्ण हत्येच्या कटाची माहिती पोलिसांसमोर उघड केली. सध्या पोलीस गावली देव जंगल परिसरात मृत बलिरामच्या सांगाड्यासह इतर अवशेषांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.