एकनाथ शिंदेंच्या नाटकाने राणे, भुजबळांच्या नाटकावर पडदा पडला; सामनातून मुख्यमंत्र्यांवर टिका

मुंबई तक

• 02:40 AM • 06 Jul 2022

मुंबई: सामनातून आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सामनातून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ‘ नाईट किंग’ म्हणून उल्लेख यामध्ये केला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत आपण देवेंद्र फडणवीसांना कसे भेटत होतो याचा किस्सा शिंदेंनी भर सभागृहात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: सामनातून आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सामनातून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ‘ नाईट किंग’ म्हणून उल्लेख यामध्ये केला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत आपण देवेंद्र फडणवीसांना कसे भेटत होतो याचा किस्सा शिंदेंनी भर सभागृहात सांगितला होता. आगामी निवडणुकीत दोनशे जागा निवडून आणण्याचा दावा शिंदेंनी केला आहे. याच सर्व अनुषंगाने सामनातून टिका करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?

मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास?

महाराष्ट्रात शिंद्यांचे सरकार आले आणि पंतप्रधान मोदी यांनी वचन दिले की, ‘महाराष्ट्राला काहीच कमी पडू दिले जाणार नाही.’ दिल्लीचे सरकार राज्यातून शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते. राज्य गेल्याशिवाय महाराष्ट्राला त्याचे हक्क द्यायचे नाहीत असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला हवे ते देऊ. त्या बदल्यात ही जोडगोळी भाजपला पुढच्या विधानसभेत दोनशे जागा मिळवून देणार आहे. नशीब विरोधकांचे की, त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही. फुटीर गटाचे नेते आणि मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगतात, ‘‘त्यांच्याबरोबर गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही.’’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखविलेला अविश्वास म्हणावा की, जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास? असा सवाल सामनातून विचारला आहे.

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’

पुढे सामनामध्ये म्हटले आहे ‘‘पळून गेलेले आमदार पुन्हा निवडून कसे येतात ते पाहू.’’ आदित्य ठाकरे म्हणतात त्या विधानात जास्त जोर आहे. श्री. शिंदे यांच्या अंगास नव्याने हळद लागली आहे. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वासपर बोलणे समजून घेतले पाहिजे. फडणवीस व ते कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे आणि उठण्याआधी परत यायचे. अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते. आता दोनशे जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे.

सध्याचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’

मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला आहे. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या वगैरे विद्रोही नाटककारांवरही लोखंडी चणे चावत बसण्याची वेळ आली. संजय राठोड, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव दांपत्यावर कालपर्यंत लिहिलेल्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची आफत आता भाजपवाल्यांवर आली आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्यांना तर धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असेच वाटत असेल. दोन दिवसांत या मंडळींना तुरुंगात टाकण्याचे संवाद आता जाहीर पत्रकार परिषदांतून कोण फेकणार? कारण या सगळ्यांनाच भाजपने ‘शुद्ध’ करून घेतले तसंच देवघरात त्यांच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवल्या. हे सर्व हिंदुत्वाचे व अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाले. प्रश्न इतकाच आहे की, सध्याचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’ आहे.

शिवसेनेसाठी आपण कसा त्याग केला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. राणे व भुजबळांचेही तेच सांगणे होते. त्यागाच्या बदल्यात काय व किती मिळाले याचाही हिशेब द्यायला हवा. श्री. शिंदे यांचे एकवेळ मान्य करू, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या किमान 25 आमदारांनी शिवसेनेसाठी कोठे रक्त सांडले, कोठे लाठ्या खाल्ल्या, घरावर कधी तुळशीपत्र ठेवले हे राज्याच्या जनतेला सांगितले तर बरे होईल अशी टिका बंडखोर आमदारांवरती करण्यात आली आहे.

    follow whatsapp