Kangana Ranaut च्या अडचणी वाढणार? अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची कोर्टाकडे मागणी

मार्च 2016 मध्ये जावेद अख्तर यांच्या निवासस्थानी झालेली एक बैठक कंगना रानौत आणि अख्तर यांच्यातल्या वादाचं कारण ठरली आहे. कंगना रनौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वादात मध्यस्थी करण्यासाठी जावेद अख्तर यांनी पुढाकार घेतला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

05 Feb 2025 (अपडेटेड: 05 Feb 2025, 11:25 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावेद अख्तर यांनी कंगनाला वॉरंट जारी करण्याची मागणी का केली?

point

कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातला वाद नेमका काय?

कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात वाद सुरू आहे. काल या प्रकरणातच्या कायदेशीर लढाईचं निराकरण करण्यासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण मध्यस्थीला अनुपस्थित राहिली. रनौतचे प्रतिनिधित्व करणारे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले, कंगना सध्या संसदेत उपस्थित असल्याने ती न्यायालयात येऊ शकली नाही.

हे वाचलं का?

जावेद अख्तर यांच्या वतीने वकील जय. के. भारद्वाज यांनी रानौत यांना उपस्थित राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला. भारद्वाज म्हणाले, रनौत महत्त्वाच्या तारखांना अनुपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र, तब्बल 40 तारखांना त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.

हे ही वाचा >> Buldhana : ATM चोरी करायला आले, बोलेरोला बांधून बाहेर ओढलं, पण शेवटी असं काय घडलं की चोरटे पळाले

दंडाधिकारी आशिष आवारी यांनी कंगनाचे वकील सिद्दीकी यांना अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. सिद्दीकी यांनी एनबीडब्ल्यू जारी करण्यास विरोध केला. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी वॉरंट जारी करण्यापूर्वी रानौतला शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला.

डिसेंबर २०२४ मध्ये, राणौत आणि अख्तर दोघांनीही या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, हे अद्याप घडलेले नाही आणि मंगळवारी होणार होते. अख्तर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाले, तर राणौत खासदार म्हणून कामात व्यस्त होते आणि त्यामुळे ते न्यायालयात येऊ शकले नाहीत.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

मार्च 2016 मध्ये जावेद अख्तर यांच्या निवासस्थानी झालेली एक बैठक कंगना रानौत आणि अख्तर यांच्यातल्या वादाचं कारण ठरली आहे. कंगना रनौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वादात मध्यस्थी करण्यासाठी जावेद अख्तर यांनी पुढाकार घेऊन आपल्या घरी बोलवून कंगनाला माफी मागायला सांगितली होती. त्यावर कंगना काही बोलली नाही, पण 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर, कंगना रनौतने एका मुलाखतीदरम्यान 2016 मध्ये जावेद अख्तर यांच्या घरी झालेल्या  बैठकीबद्दलचा उल्लेख केला.

हे ही वाचा >> Rahul Solapurkar : "दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली, गुन्हा दाखल झाला पाहिजे", अंधारे, मिटकरी आक्रमक

जावेद अख्तर यांना ते अपमानास्पद वाटलं आणि नंतर त्यांनी रनौतविरुद्ध मानहानीची दावा दाखल केला. जेव्हा कंगना रानौतनेही जावेद अख्तर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यामध्ये तिने माफी मागण्यासाठी आपल्यावर अनावश्यक दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अख्तर यांच्यावर केला. त्यानंतर हा वाद वाढत गेला. मात्र, दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्याविरुद्धच्या या कारवाईला स्थगिती दिली.

    follow whatsapp