हे सगळं गंभीर!; ‘करूणा शर्मा-धनंजय मुंडे’ प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. रविवारी परळीत झालेल्या प्रकारानंतर आता करुणा शर्मा यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, दबावाविना चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:46 AM • 06 Sep 2021

follow google news

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. रविवारी परळीत झालेल्या प्रकारानंतर आता करुणा शर्मा यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, दबावाविना चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मलाही आपल्या माध्यमातून ईडीने look out नोटीस काढली आहे, असं कळलं आहे. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने आणि कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं तेच योग्य होईल’, असा सल्ला फडणवीस यांनी देशमुखांना दिला.

यावेळी धनंजय मुंडे-करुणा शर्मा प्रकरणावरही फडणवीसांनी भूमिका मांडली. ‘यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाहीये.’

karuna sharma : मला दबाव टाकून पैसे उकळायचेत; करुणा शर्मांची कथित ‘कॉल रेकॉर्डिंग’ व्हायरल

‘तिथे ही घटना घडली आहे; त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली जात आहे, हे स्पष्ट होत आहे. करुणा शर्मा यांची चौकशी झाली पाहिजे. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ आणि नंतर मिळालेलं पिस्तुल हे सर्व गंभीर आहे. दबावाविना याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

धक्कादायक ! करुणा शर्मांच्या गाडीत सापडलं पिस्तुल, हत्यार कुठून आलं याबद्दल संभ्रम कायम

लचके तोंडण्यासाठी महाविकास आघाडी

‘आघाडी झाली ती प्रशासनासाठी झालेली नाही, तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येकजण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते जमले नाही; तर आपसात लचके तोडा असं त्यांचं सुरू आहे’, असा टोला फडणवीसांनी लगावला.

‘राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो’, लॉकडाऊनवरुन मुख्यमंत्र्यांनी कोणाला सुनावलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

सगळंच उघडण्याची घाई करू नका, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरून मनसे व भाजपला आवाहन केलं होतं. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री काय बोलले, याच्यावर मी बोलणार नाही. त्यांनी आपल्या सोबतच्या आणि पक्षातल्या लोकांना आधी सांगावं; नंतर आम्हाला बोलावं’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.