राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय; माणसांना या विषाणूपासून धोका आहे का?

मुंबई तक

• 06:17 AM • 23 Sep 2022

लंपी रोगाचं थैमान राज्यभर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त बैल आणि गायींना या रोगाची लागण झाली आहे. तर 300 पेक्षा जास्त जनावरं या लंपी रोगामुळे दगावली आहेत. मागच्या 15 दिवसात बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनानं पाऊलं उचलणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याच्या पशुधनाच्या जीविताला […]

Mumbaitak
follow google news

लंपी रोगाचं थैमान राज्यभर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त बैल आणि गायींना या रोगाची लागण झाली आहे. तर 300 पेक्षा जास्त जनावरं या लंपी रोगामुळे दगावली आहेत. मागच्या 15 दिवसात बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनानं पाऊलं उचलणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याच्या पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हे वाचलं का?

जनावरांचा कोरोना वाढतोय वेगाने

2020 साली जनावरांना लागण होणारा लंपी हा रोग आला होता. मात्र त्यावेळी संसर्ग होण्याचं प्रमाण जरी जास्त असलं तरी त्यावेळी जनावरांवर याचा जास्त परिणाम होत नव्हता. मात्र या रोगाचं म्युटिशन वाढल्याने संसर्गाचा वेग आणि जनावरांवर होणारा परिणाम वाढला आहे. त्यामुळे हा विषाणू जनावरांच्या अवयवांवर हल्ला करत आहे. त्यामुळे जनावरांचे जीव देखील जात आहेत. कोरोनाप्रमाणे हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. गाय आणि बैलांमध्ये हा रोग आढळून येतोय इतर प्राण्यांना याची लागण झालेली नाही. तर मानवावर या विषाणूचा कोणताही परिणाम नाही, असं डॉक्टर सांगतात.

लसीकरणाला सुरुवात

राज्यात जवळपास 2 कोटीच्या पशुधन आहेत. तर राज्यात सध्या प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जवळपास 50 लाख लसी राज्यात उपलब्ध झालेत. त्यापैकी 25 लाख जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. दररोज प्रत्येक गावात जाऊन अधिकारी लसीकरण करून याबाबत काय काळजी घ्यायची त्याची जनजागृती करत आहेत. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून जनावरांचे बाजार देखील बंद करण्यात आले आहेत.

लंपी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?

या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते. लंपीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो. जनावरे चारा खाणे, पाणी पिण्याचा प्रमाण कमी होतो.हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते. पायावर तसेच कानामागे सूज येते.जनावरे दूध देण्यास कमी पडतात.

शेतकऱ्यांना बसतोय लंपी व्हायरसचा फटका

देशातील अनेक राज्यात लंपी स्किन या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे हजारो जनावरांना याची लग्न झाली आहे. संक्रमण झालेल्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटातून जावं लागत आहे. कारण शेतीसह शेतकऱ्यांचा दुधाचा जोड व्यवसाय असतो. त्यामुळे दूध कमी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. म्हणून यावर शासनाने तात्काळ उपाययोजना आणाव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

दूध जास्त काळ उकळावे

गाईच्या दुधात असलेले विषाणू देखील दूर केले जाऊ शकतात. यासाठी दूध जास्त वेळ उकळणे आवश्यक आहे. अन्यथा पाश्चरायझेशनद्वारे वापरले जाणारे दूध कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, कारण ते विषाणू पूर्णपणे नष्ट करते. यामध्ये मानवासाठी कोणतेही हानिकारक घटक शिल्लक नाहीत. परंतु हे दूध जर गाईच्या वासरांनी पिले तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत वासरांना वेगळं करावं.

लंपी व्हायरसचा मानवांना धोका आहे का?

लंपी विषाणूचा मानवांना कोणताही धोका नाही, तो प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये पसरतो. अशा स्थितीत जनावरांची लाळ आणि डास चावल्याने त्याचा प्रसार होतो. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जनावरांच्या चवीच्या कळ्या कडुलिंब किंवा हळद आणि तुपाच्या पेस्टने मळून घेतल्यास जखमा भारतात आणि या आजाराने ग्रस्त गुरे 1 आठवडा ते 10 दिवसांत बरी होऊ शकतात. परंतु यापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय लसीकरण, ज्याद्वारे त्याचे संक्रमण वेगाने थांबवता येते.

संक्रमित जनावरांना पूर्णपणे वेगळे करणे आवश्यक आहे

विषाणूचा संसर्ग रोखण्याबाबत तज्ञांचे असे मत आहे की, संक्रमित प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. संसर्गाचा वेग वेगवान असला तरी गुरांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत शेतकरी व गोशाळा कर्मचाऱ्यांनी प्रथम संक्रमित गायीला उर्वरित जनावरांपासून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा, हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये वेगाने पसरतो.

    follow whatsapp