ईडीने एक पट्टी पढवली आणि राज ठाकरेंच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला-छगन भुजबळ

ईडीने एक पट्टी पाठवली आणि राज ठाकरे यांच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोला महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले छगन भुजबळ? विरोधी पक्ष आम्हाला शत्रू समजतात. कारण नसताना अनेकांना तुरुंगवास […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:39 AM • 08 Apr 2022

follow google news

ईडीने एक पट्टी पाठवली आणि राज ठाकरे यांच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोला महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले छगन भुजबळ?

विरोधी पक्ष आम्हाला शत्रू समजतात. कारण नसताना अनेकांना तुरुंगवास भोगावा लागतो आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये घाबरगुंडी निर्माण केली जात असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंवरतीही तोफ डागली आहे. राज ठाकरेंना निवडणूक आल्यानंतर कंठ फुटला आहे. ईडीने एक पट्टी पढवल्यांनंतर राज ठाकरेंच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोमणा त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

काळजी करू नका आपण ओबीसींचा हक्क मिळवणारच आहोत. शेनातले किडे बनून राहू नका बाहेर या. जाती जातीत अडकून पडू नका. ”रोज रोज गिरकर भी मुक्कमल खडा हु, ए मुश्किल देख मैं कहा खडा हु, खुशिया आये जिंदगी में तो चाख लेना दावाई समझकर, अगर गम आये तो वो भी खा लेना मिठाई समझकर” असा शेअर मारत भुजबळांनी उपस्थितांची मनं जिंकली. अनिल देशमुख कोणाशी तरी बोलले हे चौथा माणूस पाचव्याला सांगतो. आता उडत उडत ऐकलं तरी ईडी लागणार, इंग्रज्यांच्या काळामध्ये काही प्रमाणात न्याय होता. वक्त हैं बदल जायेगा, आज तुम्हारा हैं कल मेरा आयेगा असेही भुजबळ म्हणाले. धर्माधर्माच्या मारामारीतून फुले शाहू आंबेडकरांचे विचारचं वाचवू शकतात असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

50 वर्षांमध्ये असला विरोधी पक्ष मी पहिलाच नाही, विरोधक आमहाला शत्रू समजतात. आम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय

जास्तीत जास्त कारवाया ईडीच्या होत आहेत. टीव्ही सुरू केला की ईडी इकडे गेली तिकडे गेली याच्या घरी गेली त्याच्या घरी गेली, याच्या भावाच्या घरी गेली. जाणीवपूर्वक कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. साध्या गुन्ह्यांमध्ये लगेच जामीन होतो म्हणून ईडी मागे लावली जाते आहे असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.

अनेक लोकांना नोटिसा आल्या होत्या, बायका पोरांसोबत अटक झाली असती. मात्र टूम करून उडी मारली आणि गेले भाजपमध्ये,काही मंत्रीसुद्धा झाले त्यांना काहीही झालं नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.