Mumbai Airport : राहुल गांधींच्या आरोपांनंतर GVK च्या उपाध्यक्षांचा मोठा दावा

मुंबई तक

08 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन तपास यंत्रणांचा वापर करुन आणि जीव्हीके समूहावर दबाव टाकून अदाणी समूहाकडे हस्तांतरित केलं, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (७ फेब्रुवारी) केला होता. मात्र अवघ्या २४ तासांत या आरोपांतील हवा खुद्द GVK कंपनीनेच काढली आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना कंपनीचे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे (chhatrapati shivaji maharaj international airport) व्यवस्थापन तपास यंत्रणांचा वापर करुन आणि जीव्हीके समूहावर दबाव टाकून अदाणी समूहाकडे हस्तांतरित केलं, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (७ फेब्रुवारी) केला होता. मात्र अवघ्या २४ तासांत या आरोपांतील हवा खुद्द GVK कंपनीनेच काढली आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष संजीव रेड्डी यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport is managed by Adani Airport Holding Limited, a company of the Adani Group.)

हे वाचलं का?

काय म्हणाले संजीव रेड्डी?

संजीव रेड्डी म्हणाले, “अदाणी समूहासोबत झालेल्या हस्तांतरणाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. या हस्तांतरणापूर्वी आम्ही बंगळुरू विमानतळाचे अधिग्रहण केलं होतं. त्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. अशातच कोरोनाचे संकट आले आणि तीन महिने मुंबईचे विमानतळ बंद होते. परिणामी आमचं उत्पन्न ठप्प झालं. आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळेच आम्ही अदाणी समूहासोबत करार करण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता”

Mumbai Airport अदानींकडे कसे गेले? राहुल गांधींनी सांगितली क्रोनॉलॉजी

राहुल गांधी यांचे आरोप काय?

लोकसभेमध्ये मंगळवारी (7 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. यावेळी राहुल गांधी यांनी अदाणी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकराने विमानतळ विकसीत करण्यासाठी दिले. नियम होता की, ज्यांना विमानतळ विकसीत करण्यासाठी द्यायचं आहे, त्यांना त्यातील अनुभव हवा. पण या नियमाला सरकारने बदललं. त्यावेळी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.

Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला

पण नियम बदलले आणि 6 विमानतळं अदानींना दिली. त्यानंतर नफ्यात सुरु असलेल मुंबई विमानतळही अदाणींकडे गेलं. कसं? तर जीव्हीके ग्रुपविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन, त्यांच्यावर दबाव टाकून ते विमानतळ अदाणींच्या हवाली केलं. याचा निकाल काय आला? तर आज 24 टक्के विमान वाहतूक अदाणींकडे आहे. तर 31 टक्के मालवाहू विमान वाहतूक अदाणींकडे आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज आंततराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदाणी समूहाच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड या कंपनीकडे आहे. यापूर्वी ते जीव्हीके समूहाकडे होते. मात्र दोन वर्षांपूर्वी हे व्यवस्थापन अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले.

    follow whatsapp