Rahul Gandhi Article : महाराष्ट्रातील नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या मते, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून ते मतदार यादीत बनावट मतदारांची भर आणि मतमोजणीतील गैरप्रकारांपर्यंत एक सुनियोजित कट रचला गेला होता. राहुल गांधी यांनी 'इंडियन एक्सप्रेस' वृत्त पत्रामध्ये याबद्दल लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदार अचानक वाढले
राहुल गांधी यांनी आपल्या या लेखामध्ये 2024 विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत काही आकडेवारीही समोर ठेवली आहे. 2019 मध्ये 8.98 कोटी असलेली मतदार संख्या मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 9.29 कोटी झाली. मात्र, विधानसभा निवडणूक 2024 ला नोव्हेंबर मध्ये ती 9.70 कोटींवर पोहोचली. सरकारी अंदाजापेक्षा (9.54 कोटी) ही आकडेवारी अधिक आहे.
नागपूरच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख
मतदानाच्या दिवशी मतमोजणी 58.22% वरून 66.05% पर्यंत वाढली, म्हणजेच 76 लाख अतिरिक्त मतं झाली. विशेषतः भाजप कमकुवत असलेल्या 85 मतदारसंघांतील 12,000 मतदान केंद्रांवर हे घडलं. नागपूरमधील कामठी मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये 56,000 ची वाढ दिसली, तर काँग्रेसची मते स्थिर राहिली असं राहुल गांधी म्हणालेत.
हे ही वाचा >> देवाच्या दारात चोरी! दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले, 500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?
निवडणूक आयोगाने मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यास नकार दिला असून, केंद्र सरकारने नियमांत बदल करून हे रेकॉर्ड गोपनीय ठेवले. या प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींकडून 5 टप्प्यांमध्ये विश्लेषण
1. पहिल्या टप्प्यात, 2023 च्या निवडणूक आयुक्त नियुक्ती कायद्याद्वारे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आयुक्त निवडीचे अधिकार देण्यात आले, ज्यामुळे निष्पक्षतेचा अभाव दिसतो.
2. दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादीत बनावट मतदारांची भर घालण्यात आली. 2019 मध्ये 8.98 कोटी असलेली मतदार संख्या मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 9.29 कोटी झाली, तर नोव्हेंबर 2024 मध्ये ती 9.70 कोटींवर पोहोचली, जी सरकारी अंदाजापेक्षा (9.54 कोटी) अधिक आहे.
3. तिसऱ्या टप्प्यात, मतदानाच्या दिवशी मतमोजणी 58.22% वरून 66.05% पर्यंत वाढली, म्हणजेच 76 लाख अतिरिक्त मते नोंदली गेली.
4. चौथ्या टप्प्यात, ही वाढ प्रामुख्याने भाजपला कमकुवत असलेल्या 85 मतदारसंघांतील 12,000 मतदान केंद्रांवर दिसली. कामठी मतदारसंघात भाजपच्या मतांमध्ये 56,000 ची वाढ झाली, तर काँग्रेसची मते स्थिर राहिली. यामुळे भाजपने 149 पैकी 132 जागा जिंकल्या, म्हणजेच 89% यशदर, जो लोकसभा निवडणुकीतील 32% पेक्षा खूप जास्त आहे.
5. पाचव्या टप्प्यात, निवडणूक आयोगाने मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यास नकार दिला, तर केंद्र सरकारने नियमांत बदल करून हे रेकॉर्ड गोपनीय ठेवले.
या प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसल्याची भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
