Sharad Pawar on Devendra Fadnavis, बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथील विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी या चर्चांची हवा काढण्याचा प्रयत्न केला होता. "अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते, शिवाय माझ्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंधही खूप चांगले होते. अजित पवार जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा करत असतील आणि या विलीनीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का, किंबहुना विलीनीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का?", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर खासदार शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांची
"देवेंद्र फडणवीसांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे? समजलं नाही. ते या सगळ्या चर्चेत कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार आहे? मला माहिती नाही", अशा शब्दात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलंय.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आता चर्चा होणार का?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, आमचे सहकारी जयंत पाटील आणि अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत होते. यापेक्षा जास्त काही नव्हते. आम्हा लोकांसमोर संकट आलंय, त्यातून परत उभारणं आणि धीर देणं. पुढे कसं जायचं? याच्यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयासंबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाहीत.
सूनेत्रा पवारांचा शपथविधी झाला आनंद आहे. संधी दिली आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी पवारांनी दिली.
जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही - शरद पवार
अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलंय. ते म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबाबत मी सुरुवातीलाच बोललोय. पुन्हा काय सांगायचं? जोपर्यंत ऑथेंटिक माहिती नाही, तोपर्यंत मी शंका घेणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा आणि राज्यसभा या सर्व संस्थांमध्ये गेली 58 वर्ष सभासद आहे. या 58 वर्षांमध्ये अंदाजपत्रक ज्यादिवशी असेल त्यादिवशी माझी गैरहजेरी कधीही झाली नव्हती. पण दुर्देवाने हा आघात झाला (अजित पवारांचा मृत्यू) त्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं, ही संधी मला यावेळेस मिळाली नाही. मात्र, जे वाचलं त्याच्यामध्ये दोन-तीन गोष्टी दिसतात. सामान्य माणसाला यातना होतील, अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळलेल्या आहेत, ही एका प्रकारे समाधानाची गोष्ट आहे. पण या अंदाजपत्रकामधून विकासाच्या दृष्टीने ठोस पाऊलांची गरज होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
ADVERTISEMENT











