खासदारानंतर आता ठाकरेंचे आमदार फुटणारच, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

bjp mla narayan kuche claims more splits in shivsena uddhav thackeray faction : खासदारामुळे झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता महाराष्ट्रातील शिवसेना (UBT) चे आमदारही फुटणार असल्याचा दावा भाजप आमदार नारायण कुचे यांनी केला असून, उद्धव ठाकरे यांच्या गटाला 2029 मध्ये उमेदवार मिळणेही कठीण होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray Shivsena

Uddhav Thackeray Shivsena

मुंबई तक

18 Jun 2026 (अपडेटेड: 18 Jun 2026, 01:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

खासदारानंतर आता ठाकरेंचे आमदार फुटणारच

point

भाजप आमदाराचा खळबळजनक दावा

bjp mla narayan kuche claims more splits in shivsena uddhav thackeray faction : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून सुरू झालेली उलथापालथ आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (UBT) च्या नऊपैकी सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवून वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आमदारांच्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. जालन्यातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी यावर सूचक विधान करताना, जे दिल्लीत घडले तेच आता महाराष्ट्रात घडणार असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाचे अनेक आमदार देखील फुटणारच, असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

हे वाचलं का?

'2029 च्या निवडणुकीत ठाकरे गटाला उमेदवारही मिळणार नाही'

नारायण कुचे यांनी यावेळी उद्धव ठाकरे गटावर कडाडून टीका केली. 2029 च्या निवडणुकीत ठाकरे गटाला उभे राहण्यासाठी उमेदवारही मिळणार नाहीत आणि 2024 ची निवडणूक ही त्यांच्यासाठी अखेरची ठरेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. जनतेला आता विकास हवा आहे, त्यामुळेच ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आता जनतेचा विश्वास उरलेला नाही आणि लोक त्यांच्या विधानांना कंटाळले आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

नारायण कुचे यांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप 

संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करताना कुचे यांनी हमीभावाच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले. राऊत यांना हमीभावाबाबत इतकी सखोल माहिती कशी मिळते, त्यांनी स्वतः कधी असा भाव घेतला नसेल तर त्यांना याची माहिती कुठून आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मागील सरकार पाडण्यासाठी राऊत हेच कारणीभूत होते आणि पैसे घेण्याबाबत ते जे आरोप करत आहेत, ते त्यांना इतके कसे माहिती आहेत, असे प्रश्न विचारत त्यांनी राऊत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

एकूणच नारायण कुचे यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. लोकसभा खासदारांच्या फुटीनंतर आता आमदारांच्या संभाव्य बंडाच्या दाव्याने ठाकरे गटासमोरील संकटात वाढ झाली आहे. स्थानिक आणि राज्यस्तरावरील नेत्यांची ही विधाने भविष्यातील राजकीय समीकरणांचे संकेत देणारी आहेत. आता या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि ठाकरे गट याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.