Raj And Uddhav Thackeray : भाजपने राज्यातील शिक्षण धोरणांतील शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय घेतलाय. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकलं आहे. अशातच आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोघेही भाऊ एकत्र येतील अशी आशा व्यक्त केलीय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे ब्रँड इज ब्रँड", असे लिहित त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दर्शवलेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपला मोठा धक्का, डोंबिवलीतील दिग्गज नेता ठाकरेंच्या शिवसेनेत?
'ठाकरे ब्रँड इज ब्रँड'
भाजपने राज्यातील शिक्षण धोरणांत शाळेच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीबाबत निर्णय घेतलाय. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकलं आहे. अशातच आता उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत दोघेही भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. 'ठाकरे बंधू ब्रँड आहेत', असे लिहित त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दर्शवलेत.
येत्या 29 जून रोजी शासन निर्णयाची होळी करत, 7 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार असं म्हणत दीपक पवार यांनी या लढ्याची घोषणा केली. तर हुतात्मा चौकातील स्मारकास्थळी अभिवादन करत लढ्याची घोषणा केली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही हिंदीच्या सक्तीला विरोध केला आहे.
राज ठाकरेंनी याबाबत आता आक्रमक भूमिका घेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी सुरूवातीपासूनच आवाज उठावला आहे. अशातच आता राज ठकरेंनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 6 जुलै रोजी राज ठाकरे हिंदीच्या सक्तीविरोधात गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहेत. हा सर्वपक्षीय मोर्चा असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, यानंतर संजय राऊतांनी केलेल्या ट्विटमुळे दोघेही ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे.
हेही वाचा : Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडणार?
यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना मेन्शन करत 'ठाकरे ब्रँड इज ब्रँड' असं म्हणत आठवण करून दिली आहे. संजय राऊतांच्या या ट्विटने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
