क्रीडा विश्वावर शोककळा, सामना सुरु असतानाच अंपायरचा दुर्दैवी अंत, अनेक खेळाडू जखमी

umpire manik gupta was killed by bees : या हल्ल्यात 65 वर्षीय वरिष्ठ अंपायर मानिक गुप्ता यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणावर दंश केले. ते पिचवर उभे राहून त्यांची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या सोबत असलेले दुसरे अंपायर जगदीश शर्मा तसेच काही अल्पवयीन खेळाडूही जखमी झाले. जखमींना तातडीने शुक्लागंजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

umpire manik gupta

umpire manik gupta

मुंबई तक

19 Feb 2026 (अपडेटेड: 19 Feb 2026, 02:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

क्रीडा विश्वावर शोककळा

point

सामना सुरु असतानाच अंपायरचा दुर्दैवी अंत

point

अनेक खेळाडू जखमी

umpire manik gupta was killed by bees : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सप्रू स्टेडियम येथे सुरू असलेल्या अंडर-13 क्रिकेट सामन्यादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सामन्याच्या मध्यावर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केल्याने वरिष्ठ अंपायर मानिक गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर अनेक खेळाडू आणि दुसरे अंपायर देखील जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्लागंज परिसरातील सप्रू स्टेडियममध्ये एचए अकादमी आणि एसबीएस अकादमी यांच्यात सामना सुरू होता. सामन्याला चांगली रंगत आली असतानाच अचानक आकाशातून मधमाशांचा मोठा थवा मैदानावर उतरला. काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली. खेळाडू, पंच आणि प्रेक्षक यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि जीव वाचवण्यासाठी लोकांनी मैदानाबाहेर धावाधाव सुरू केली.

या हल्ल्यात 65 वर्षीय वरिष्ठ अंपायर मानिक गुप्ता यांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणावर दंश केले. ते पिचवर उभे राहून त्यांची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या सोबत असलेले दुसरे अंपायर जगदीश शर्मा तसेच काही अल्पवयीन खेळाडूही जखमी झाले. जखमींना तातडीने शुक्लागंजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मानिक गुप्ता यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कानपूर येथील हैलट रुग्णालयात आणि त्यानंतर कार्डिओलॉजी विभागात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर जखमी खेळाडूंची प्रकृती सध्या स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

मानिक गुप्ता हे गेली सुमारे 30 वर्षे कानपुर क्रिकेट एसोसिएशन सोबत जोडलेले होते. ते केडीएमए क्रिकेट लीगचे अनुभवी आणि आदरणीय पंच म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सहकारी पंच, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, मैदानावर मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्टेडियम परिसरात आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एका आनंददायी क्रीडा स्पर्धेदरम्यान घडलेल्या या अनपेक्षित घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या मुलीला आईची जात अन् आडनाव लावण्यास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
 

    follow whatsapp