गुरूचा 'या' राशीत प्रवेश, पाहा कसं असेल तुमचं राशीभविष्य!
Astrology 2025 : गुरू ग्रहाने 14 मे रोजी बृहस्पती मिथून राशीत प्रवेश केला आहे. या पाच महिन्यांच्या अतिचरीनंतर गुरू हा कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या ग्रहांमधील बदलांमुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. आता त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. ते खालीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

1/7
गुरू ग्रहाने 14 मे रोजी बृहस्पती मिथून राशीत प्रवेश केला आहे. या पाच महिन्यांच्या अतिचरीनंतर गुरू हा कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या ग्रहांमधील बदलांमुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. आता त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. ते खालीलप्रमाणे नमूद करण्यात आल्या आहेत, त्याबाबत जाणून घ्या.

2/7
मीन राशी : या राशीसाठी गुरूचे भ्रमण होणं अगदी लाभदायक असणार आहे. या काळामध्ये नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळणार आहे. नात्यात गोडवा येणार आहे.

3/7
तूळ राशी : या राशीतील लोकांसाठी गुरुचे भ्रमण हे सौभाग्याची दिशा दाखवणारे आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि लाँग ड्राईव्हला जाण्याची शक्यता असेल. आपल्याला नशीबाची चांगली साथ मिळणार आहे. ज्यामुळे तूळ राशींच्या लोकांचे करिअर आणि अभ्यासात चांगलं यश मिळेल.

4/7
दरम्यान, तूळ राशीच्या लोकांसाठी मालमत्तेतून नफा आणि पैशाची बचत होण्याची शक्यता आहे. तसेच कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वादाला पूर्णविराम मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी चांगलं यश मिळणार आहे. प्रवाशांसाठी हा चांगला योग असणार आहे.

5/7
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाच्या भ्रमणामुळे पैशांचं पाठबळ निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्याला पैसे गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ असेल. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता निर्माण होऊन वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे.

6/7
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसायाबाबतीत अगदी फायदेशीर असेल. नोकरीत नवीन प्रकल्पांसाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच व्यवसाय क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. विवाहित आणि अविवाहितांच्या नातेसंबंधांमध्ये आदराची भावना वाढेल.

7/7
दरम्यान, या काळामध्ये वृषभ राशींच्या लोकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी अनेक समस्या येतील. तर खोळंबलेलं काम तात्काळ पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनात समाधाना प्राप्त होणार आहे.