मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तर आठवडाभरात माझी बातमी दिसेल, ठाकरेंना सत्तारांचं चॅलेंज

मुंबई तक

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदे गटात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानावर सत्तारांनी फॉर्म्युला सांगितला आणि प्रतिआव्हानही दिलं. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात आलेल्या ओला दुष्काळाच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “विरोधीपक्षाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदे गटात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानावर सत्तारांनी फॉर्म्युला सांगितला आणि प्रतिआव्हानही दिलं.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात आलेल्या ओला दुष्काळाच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “विरोधीपक्षाला काय बोलायचं, काय करायचं हे त्यांचं काम आहे. सत्ताधारीला सत्ता टिकवण्यासाठी बाकीच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या… नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही.”

“आता ओला दुष्काळ जाहीर झाला, तर ३२ टक्के उसाचं क्षेत्र आहे. त्यांनाही द्यायचं का? त्यांना दिलं, तर ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे काय हाल होतील?”, असा प्रतिप्रश्न सत्तारांनी उपस्थित केला.

Shiv Sena split : निकाल लांबणार? शिंदे-ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp