महाराष्ट्र काँग्रेसकडून हकालपट्टी! आशिष देशमुखांना संतापले, नाना पटोलेंवर प्रहार

योगेश पांडे

ADVERTISEMENT

ashish deshmukh Reply after congress dismissed him from party, deshmukh attacks on nana patole
ashish deshmukh Reply after congress dismissed him from party, deshmukh attacks on nana patole
social share
google news

माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आशिष देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ओबीसी नेते असा उल्लेख करत देशमुखांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर प्रहार केला आहे. राहुल गांधींनी ओबीसींची माफी मागितली असती, तर त्यांना राजीव गांधींकडून झालेली चूक दुरूस्त करता आली असती, असंही देशमुखांनी म्हटलं आहे.

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आशिष देशमुख म्हणाले, “निष्कासनाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ही कारवाई म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांकडे असल्याचे द्योतक आहे. ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. मला त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यावर मी सविस्तर उत्तर दिले होते. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर सविस्तर प्रसिद्ध केले. त्यात काही तथ्य होते म्हणूनच त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना समाधानकारक वाटत नाही, एवढेच कारण त्यांनी निष्कासनासाठी दाखविले आहे. याचा अर्थ मला पक्षातून काढण्याचे आधीच ठरले होते आणि नोटीसनंतर दिली गेली, असाही काढता येतो.”

हेही वाचा >> Bacchu Kadu यांचं मंत्रिपद गेलं? शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

आशिष देशमुख यांनी त्यांच्या निवेदनात कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नसला, तरी त्यांचा रोख नाना पटोले यांच्याकडेच असल्याचं दिसत आहे. ते म्हणतात “काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी बलिदान दिले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मात्र स्वातंत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाहीत. त्यांना जो आवडत नाही, त्याला ते दूर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वतःला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे पक्षातील वजन वाढले, तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, “माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सूचना मी केली. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते.”

काँग्रेससाठी आमदारकी सोडणारा मी एकमेव

बडतर्फ करण्याच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करताना देशमुख यांनी म्हटलं आहे की, “माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत हे खरे आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपद व मंत्रिपदे भूषविली. त्यामुळे माझा ओढा त्या पक्षाकडे असणे स्वाभाविक होते. पण, काँग्रेसमध्ये डोके आणि वाणी वापरणारे लोकं चालत नाहीत, असे माझ्या लक्षात आले तेव्हा मी त्या पक्षापासून दूर झालो. 2014 मध्ये भाजपाकडून निवडणूक लढलो व जिंकलो. पण, काँग्रेसबद्दलची आस्था संपलेली नव्हती. त्यामुळे राहुलजी, सोनियाजी यांच्याशी बोलून मी पुन्हा काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेससाठी आमदारकी सोडणारा मी एकमेव आहे.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

“ओबीसींसाठी मला काम करायचे आहे, असे मी त्यांना पक्षात परत येताना म्हणालो होतो आणि त्यांनी काँग्रेसमध्ये राहून तुम्हाला ते करता येईल, असे म्हटले होते. पण, महाराष्ट्रातील नेत्यांनी श्रेष्ठींच्या भावनेची किंवा काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांची देखील दखल घेतली नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

“काँग्रेस नेते बोध घेण्यास तयार नाही”

ओबीसी मुद्द्यावरून आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमधील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. “काँग्रेसमध्ये परतल्यावर मला सातत्याने डावलले गेले. काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाचे जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांची मानसिकता उच्चवर्णीयांसारखी झाली आहे. त्यांना ओबीसींचे खरे प्रश्न हाताळण्यापेक्षा ओबीसींच्या मतांशी देणेघेणे आहे. मात्र, ओबीसी लोकांनी काँग्रेसचा कावा ओळखला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बेस असलेला ओबीसी मतदार काँग्रेसपासून दूर गेला असून, काँग्रेसच्या घसरणीचे ते प्रमुख कारण आहे. मात्र, यातून कोणताही बोध घेण्यास काँग्रेसचे नेते तयार नाहीत”, असं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांवर देशमुखांचा घणाघात

महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांबद्दल बोलताना देशमुखांनी म्टलं आहे की, “भविष्यात मला ओबीसींच्या, शेतकऱ्यांच्या व युवकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेतलेला नाही. योग्यवेळी सर्वांना कळेल. मी कुण्या नेत्याकडे गेलो किंवा माझ्याकडे कुणी आलो म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार, असा अर्थ काढण्याची घाई करू नका. राजकारणाच्या पलिकडे देखील काही संबंध असतात आणि ते जपावे लागतात. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून देखील मैत्री भाव जपण्याची राजकारणातल्या बऱ्याच लोकांमध्ये पद्धत आहे. दुर्दैव असे की, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही दिलदारी नाही. त्यांना त्यांच्यावरची टीका आवडत नाही.”

हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?

“ओबीसींच्या मुद्यांवर मी आवाज उचलला तर ते देखील आवडत नाही. मी लोकतांत्रिक पद्धतीने काही मुद्दा मांडला तर ते देखील आवडत नाही. थोडक्यात त्यांना आशिष देशमुख आवडत नाही. कारण आशिष देशमुख हा ओबीसींचा खरा प्रतिनिधी आहे, हे त्यांना माहिती आहे आणि तो आपल्याला वरचढ होऊ शकतो हेही त्यांना माहिती आहे”, असं म्हणत आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

“ओबीसींसोबत काँग्रेसची कोणतीही बांधिलकी राहिली नाही”

देशमुखांनी पुढे म्हटलं आहे की, “या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे दाद मागण्यात काही अर्थ आहे, असे वाटत नाही. त्यांची देखील महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिशाभूल करून ठेवली आहे. ज्या ओबीसी समुदायाच्या पाठिंब्यावर ज्या काँग्रेसने या देशात सहा दशकांहून अधिक काळ राज्य केले, त्या ओबीसींशी आता काँग्रेसची कोणतीच बांधिलकी नाही, हे दुःखदायक आहे. एक ऐतिहासिक सत्य काँग्रेसचे नेते विसरत आहेत. राहुल गांधी यांनी ओबीसी समुदायाचा अवमान केला, हा जो आरोप त्यांच्यावर लागला, ती अलिकडची गोष्ट आहे.”

“मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना राहुलजींचे पिताश्री राजीव गांधी यांनी विरोध केला होता. 1990 च्या आसपासची ही घटना आहे. काँग्रेसचा ओबीसी जनाधार तेव्हापासून वेगाने कमी झाला. आणि आज त्या काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे. ओबीसी समाजाची माफी मागून राहुलजींना ताजा विषय संपविता आला असता आणि त्यांच्या पिताश्रींनी केलेली ऐतिहासिक चूक देखील काही प्रमाणात दुरुस्त करता आली असती”, असं म्हणत देशमुखांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला दिला आहे.

हेही वाचा >> सुषमा अंधारेंवर आरोप, जाधवांची हकालपट्टी! ठाकरेंनी ठरवला बीडचा जिल्हाप्रमुख

“ओबीसी समुदायाशी नाळ तोडणे हे भारताच्या आत्मतत्त्वाशी नाळ तोडण्यासारखे आहे. काँग्रेसची पिछेहाट त्यामुळेच सुरू आहे. काँग्रेसने आपल्या मूळ जनाधाराशी पुन्हा संबंध प्रस्थापित करावेत, असे मला वाटले. त्यामुळे मी राहुलजींना ओबीसींची माफी मागण्याची सूचना केली, तर मलाच पक्षातून काढून टाकले. ओबीसी समुदायाशी असलेली नाळ तोडल्यामुळे काँग्रेसच्या सत्तेला ग्रहण लागले. त्यानंतर परिस्थिती इतकी बदलली की, केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची विरोधी बाकावरची उपस्थिती देखील जेमतेम शिल्लक राहिलेली आहे. कारण काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्षांनी घेतलेली आहे”, अशा शब्दात आशिष देशमुख यांनी काँग्रेसला सुनावलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT