Nilesh Lanke: ‘ती माझी बायको…’ गुंड गावात घुसल्यावर ‘तो’ आला गाडीसमोर, हा राजकीय ड्रामा अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

There was a big uproar from the post of sarpanch in the gram panchayat of a village in Parner. In which the villagers united and foiled the plan of the opponents. See what the villagers actually did this time.
There was a big uproar from the post of sarpanch in the gram panchayat of a village in Parner. In which the villagers united and foiled the plan of the opponents. See what the villagers actually did this time.
social share
google news

News on Maharashtra Politics: रोहित वाळके, पारनेर: आज-काल राजकारणात गुंडशाहीचा शिरकाव झाला आहे. त्याला रोखणं फारच कठीण झालं आहे. मात्र, आमदारांच्या गुंडशाहीविरोधात अख्खं गाव जेव्हा एकवटतं आणि या गुंडांना गावातून पिटाळून लावतं तेव्हा त्याची चर्चा तर होणारच ना भाऊ.. अशीच काहीशी जबरदस्त घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात पारनेर (Parner) तालुक्यात घडली आहे.

तर झालं असं की, पारनेर तालुक्यातील देसवडे या लहानश्या गावातील सरपंच जनाबाई पोपट दरेकर यांच्यावरील अविश्वास ठराव हा बारगळला. अतिशय नाट्यमय घडामोडीत देसवडे गावातील ग्रामपंचायत सरपंच कार्यालयात हजर होताना बरीच वादावादी झाली. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु पारनेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले नाही.

अविश्वास ठरावाच्या विरोधात पाच विरुद्ध चार अशा मताने ठराव संमत झाला. त्यामुळे सरपंच बाईंचं पद अबाधित राहिलं. अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर 22 जुलैला भाऊसाहेब गणपत टेकुडे यांनी सचिन भोर व सुयोग दाते (रा. देसवडे ता. पारनेर) यांच्यावर ग्रामपंचायतील काही सदस्यांचे अपहरण करून त्यांना लपवून ठेवण्यात आलं असल्याची फिर्याद देण्यात आली होती. तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे गाव असलेल्या देसवडे येथील सरपंचावरील अविश्वास ठराव पारित करण्यासाठी केलेला आटापिटा केविलवाणा असल्याची चर्चा देखील यानिमित्ताने सुरू झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘ती माझी बायको आहे..’

दरम्यान, अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यासाठी मतदानाला सदस्यांना काही गाड्यांमधून गावात आणण्यात आलं. त्यावेळी आमदार लोगो लावलेल्या गाड्यांमध्ये या गावातील सदस्यांना बसविण्यात आलं होतं. अविश्वास ठराव पास व्हावा आणि सध्या असलेल्या सरपंचाचं पद जावं यासाठी ही सगळी खेळी असल्याचं गावकऱ्यांचा लक्षात आलं. त्यामुळे याच खेळीविरोधात अख्खं गाव एकत्र आलं. यावेळी गावकऱ्यांनी सदस्यांना ज्या गाड्यांमधून गावात आणलं जाणार होतं त्या गाड्याच गावच्या वेशीवर अडवल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने गाड्यांमधून आलेल्या बाहेरील लोकांना फारसा काही आक्षेप घेता आला नाही.

जेव्हा गाड्या वेशीवर आल्या तेव्हा एका महिला सदस्याने थेट गाडीसमोर येऊन ती गाडी अडवली आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या त्याच्या बायकोला खाली उतरवण्यास सांगितलं. तुमची दहशत आहे असे आरोप करताना त्याने म्हटलं की, ‘ती माझी बायको आहे.. मला तिला खाली उतरवायचंय गाडीच्या खाली. तुमची एवढी दहशत आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mumbai: शूटिंग सुरू असतानाच ‘या’ सेटवर घुसला बिबट्या, मराठी कलाकारांची तंतरली!

हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच घडत होता. त्यामुळे गाडीमधील इतर लोकांना त्या महिला सदस्याला खाली उतरावं लागलं आणि इथेच देसवडे गावच्या गावकऱ्यांनी बाजी मारली. कारण हे एक मत अत्यंत महत्त्वाचं ठरलं. ज्यामुळे सरपंचाविरोधात जो अविश्वास ठराव आणण्यात आला होता तो पारित झाला नाही. ज्यामुळे गावकऱ्यांनी एकजुटीने आपला सरपंच कायम ठेवला.

ADVERTISEMENT

शिंदे गटाच्या नेत्याचे आमदार निलेश लंकेवर गंभीर आरोप, समजून घ्या नेमकं प्रकरण काय

दरम्यान, याप्रकरणी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर याप्रकरणी अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे असे आरोप केले आहेत.

संजीव भोर-पाटील यांनी लंकेंवर आरोप करताना म्हटलं की, ‘अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मौजे देसवडे हे छोटंसं गाव आहे. या गावात 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. काही दिवसापूर्वी या तालुक्याचे, या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, पारनेरचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी या गावातील काही सदस्य पारनेर तालुक्यापर्यंत नेले काही निवेदन द्यायचे म्हणून.’

‘त्यानंतर आहे त्या परिस्थितीत अंगावरील कपड्यांनिशी म्हणजे कोणालाही न सांगता, पूर्वसूचना न देता.. हे सगळे सदस्य पळवले आणि त्यांचे मोबाइल काढून घेतले. त्यांचा संपर्क तोडला. एक दिवस तालुक्याच्या गावाला न्यायचं म्हणून नेलेल्या सदस्यांकडून हवं त्या पद्धतीने हवा तसा जबाब घ्यायचे. आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मोबाइल चालू करायचा नाही. अशा पद्धतीची दडपशाही केली.’

हे ही वाचा >> Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…

‘नंतर ग्रामपंचायतीत जो अविश्वास ठराव यांनी दाखल करून घेतला त्या ठरावाच्या ठिकाणी या सदस्यांना घेऊन जाण्यासाठी आमदार लंकेंच्या 25 गाड्यांमधून 150 ते 200 गुंड आमदार लोगो लावलेल्या गाड्या हा सगळा ताफा तिथे गावासमोर आला.’

‘तेव्हा प्रचंड दहशत, दडपशाही, दादागिरी करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. मात्र त्या देसवडे गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने आमदार लंकेंच्या गुंडांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. त्याठिकाणी दाखल झालेला अविश्वास ठरावही बारगळला.’

‘कारण या गाडीतून उतरलेल्या महिला सदस्याने यांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर त्या ग्रामपंचायत सभेकडे पाठ फिरवली आणि आमदार लंकेंच्या या सगळ्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा जो काही अश्लाघ्य प्रयत्न केला. तो निष्फळ ठरला.’

‘मात्र लंकेंच्या माध्यमातून गावागावात असे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे बिहारला लाजवेल अशा पद्धतीचं राजकारणाची त्यांची शैली आहे. ही लोकशाहीला घातक आहे. देसवडे गावासह इतर गावागावांमधून त्यांच्या झुंडशाहीला आता विरोध होणार आहे.’ असे आरोप भोर-पाटील यांनी आमदार लंकेंवर केले आहेत.

दरम्यान, देसवडे गावातील जनतेने मोडून काढलेल्या गुंडगिरीचं आता कौतुक होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT