Govind Pansare यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी ATS कडे, बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय

विद्या

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टाच्या संमतीने एसआयटीकडून ATS कडे सोपवण्यात आला आहे. एसआयटीतले काही अधिकारी एटीएसला त्यांच्या तपासात सहकार्य करणार आहे. २०१५ पासून एसआयटीला पानसरे हत्या प्रकरणात अपेक्षित यश मिळत नसल्याने हा तपास एटीएसकडे सोपवण्यात यावा अशी विनंती पानसरे कुटुंबाने केली होती. न्यायाधीश रेवती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टाच्या संमतीने एसआयटीकडून ATS कडे सोपवण्यात आला आहे. एसआयटीतले काही अधिकारी एटीएसला त्यांच्या तपासात सहकार्य करणार आहे. २०१५ पासून एसआयटीला पानसरे हत्या प्रकरणात अपेक्षित यश मिळत नसल्याने हा तपास एटीएसकडे सोपवण्यात यावा अशी विनंती पानसरे कुटुंबाने केली होती.

न्यायाधीश रेवती मोहित डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की पानसरेंच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएएसकडे सोपवण्यात आला आहे. सात वर्षांपासून या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला यश आलेलं नाही. त्यामुळे हा तपास एटीएसला सोपवला गेला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ ला हत्या करण्यात आली. १६ फेब्रुवारी २०१५ ला कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूरातील या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र इतकी वर्ष तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागलेलं नाही, त्यामुळे एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून आता तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp