Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! CM एकनाथ शिंदे आल्यानंतर काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation Eknath shinde meets manoj jarange. hunger strike ended by manoj jarange.
Maratha Reservation Eknath shinde meets manoj jarange. hunger strike ended by manoj jarange.
social share
google news

Manoj Jaragne stop hunger strike : मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण आज सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवली सराटी इथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण थांबवत असल्याची घोषणा केली.

मराठा आरक्षण आणि मराठा जातीला कुणबी म्हणून जातप्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. उपोषण सुरू असतानाच पोलिसांनी लाठीमार केल्यानं हे उपोषण चर्चेत आले होते.

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?

दरम्यान, मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले, तरच उपोषण मागे घेणार असल्याची अट घातली होती. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि इतर नेत्यांसह मनोज जरांगेंची भेट घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी उपोषण थांबवण्याची केली घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्त सरबत पिले आणि उपोषण थांबवत असल्याची घोषणा केली.

हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

मनोज जरांगे यावेळी म्हणाले की,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते आरक्षण देतील असे मराठा समाजाला वाटते. त्यामुळे नक्कीच मराठा आरक्षण देतील. सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. सरकारने मागितला तर आणखी एक आठवडा वेळ देतो, पण आम्हाला टिकणार आरक्षण द्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी ठेवलेल्या आहेत पाच अटी

1) अहवाल कसाही आला, तरी 31 व्या दिवशी महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र वाटप करायला सुरूवात करावी. हे मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लेखी द्यायचं आहे.

ADVERTISEMENT

2) महाराष्ट्रात या आंदोलनादरम्यान जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत, ते सगळे मागे घ्यायचे.

3) जितके अधिकारी दोषी आहेत, त्या सगळ्यांना निलंबित करा.

4) उपोषण सोडायला मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री (अजित पवार) आणि सगळं मंत्रिमंडळाने इथे येऊन सांगावं. त्यांच्याबरोबर छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती हे आले पाहिजे. दोन्ही राजांनी यात मध्यस्थी करावी.

5) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या मागण्या पूर्ण करणार असे लिहून द्यावं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT