‘राहुल गांधींना अटक करून खटला दाखल करा’, रणजित सावरकरांच्या तक्रारीत नाना पटोलेंचाही उल्लेख

मुंबई तक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीये. वीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथील सभेत वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि भारताविरुद्ध काम करत होते, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीये. वीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथील सभेत वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि भारताविरुद्ध काम करत होते, असा आरोप केला होता. यावर रणजित सावरकरांनी आक्षेप घेतला आहे.

रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये. या तक्रारीत राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी करण्यात आलीये. त्याचबरोबर नाना पटोले यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी करण्यात आलीये.

राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर

हे वाचलं का?

    follow whatsapp