मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, 5 जण दगावल्याची माहिती, रेल्वेत काय घडलं?
Mumbai Railway Accident : मध्य रेल्वे मार्गावर दहा ते बारा प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत एकूण पाच जणांना दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 9 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई मध्यरेल्वेवर मन सुन्न करुन टाकाणारी धक्कादायक घटना घडली

रेल्वेमधून काही प्रवासी हे थेट रेल्वे ट्रॅकवर पडल्याची दुर्देवी घटना घडली
Mumbai Railway Accident : मुंबई मध्यरेल्वेवर मन सुन्न करुन टाकाणारी धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेमधून काही प्रवासी हे थेट रेल्वे ट्रॅकवर पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना 9 जून रोजी सकाळी 8.25 वाजता घडली आहे. काही प्रवासी हे दरवाजाजवळ लटकत असताना रेल्वे ट्रॅकवर पडले होते. त्यातील पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ही घटना दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे.
हेही वाचा : मुंबईत धावत्या एक्सप्रेसमधून प्रवासी पडले, 5 जण दगावल्याची माहिती, रेल्वेत काय घडलं?
नेमकं काय घडलं?
मुंबईहून जाणारी रेल्वे ही दिवा आणि कोपर रेल्वे स्टेशनदरम्यान आली असताना हा मोठा अपघात झाला. यामुळे प्रवासी दगावले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. लोकलमधून तब्बल दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं मुंबई आणि ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेचे अनेक व्हिडिओ आता समोर आले आहेत. या व्हिडिओत काही प्रवासी हे प्लॅटफॉर्मवरती पडलेले दिसत आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रेल्वे जनसंपर्क विभागाकडून अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. या अपघातात 30 ते 35 वय वर्षे असणाऱ्या प्रवशांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : तरूणाने वृद्धाला दगडाने ठेचून संपवलं, रंगेहाथ पकडल्यावर आरोपीच्या डोक्यात दगड...
दरम्यान, या घटनेची माहिती ही कासाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं दिली आहे. दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांना अॅम्बुलन्समधून जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रवाशांवरती सध्या उपचार सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात होण्यापूर्वी रेल्वेचे पुढील स्थानक कल्याण होते. कल्याणपूर्वीच म्हणजेच दिवा आणि मुंब्रादरम्यान हे प्रवासी पडल्याचे सांगण्यात येत आहे.