‘माझा कॉल रेकॉर्ड का केला?’ ‘लव्ह जिहाद’वरून नवनीत राणांचा पोलिसांशी वाद; नक्की काय घडलं?

मुंबई तक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यानंतर आता लव्ह जिहादकडे मोर्चा वळवला आहे. लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं बघायला मिळालं. फोनवरून बोलत असताना संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी तक्रार दिली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यानंतर आता लव्ह जिहादकडे मोर्चा वळवला आहे. लव्ह जिहाद प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं बघायला मिळालं. फोनवरून बोलत असताना संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी तक्रार दिली आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केला होता. त्यानंतर राणा या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं.

नवनीत राणा आक्रमक का झाल्या, प्रकरण नेमकं काय?

झालं असं की, मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्याच्या २४ तासानंतरही मुलगी सापडत नसल्यानं मुलीच्या आईवडिलांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेतली. मुलीला शोधावं म्हणून विनंती केली.

रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

हे वाचलं का?

    follow whatsapp