‘…मग सत्तेत राहायचं कशाला?’, अजित पवारांची एन्ट्री, संजय शिरसाट काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Politics : sanjay shirsat express disappointment after bjp do alliance with ajit pawar.
Maharashtra Politics : sanjay shirsat express disappointment after bjp do alliance with ajit pawar.
social share
google news

Maharashtra News, Shiv Sena : अजित पवारांनी भाजपसोबत बस्तान बसवलं, पण टेन्शन वाढलं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं, अशी चर्चा सुरू झालीये. शिवसेना नेत्यांकडूनच यावर भूमिका मांडण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. एक भाकर मिळणार होती. आता अर्धी मिळेल, असं सांगताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची नाराजी लपून राहिली नाही. त्यानंतर प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही भूमिका मांडली. त्यांनी असाच सूर आवळला.

2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला राजकीय धक्का बसला. आम्ही महायुतीत आलो असून, एकत्रच राहणार आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. पण, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला तडतोडी स्वीकाराव्या लागणार असं बोलण्यास सुरूवात झाली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, अजित पवारांना का घेतलं?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट म्हणाले की, “आम्हाला बहुमताची गरज नव्हती. मग का घेतलं? हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सगळा आकडा 172 पण गेलेला असताना यांना घ्यायची गरज काय आहे? परंतु राजकारणात काही समीकरणं बसवताना, मग ती येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि प्रत्येकाची एक ताकद असते. पक्ष असतोच. पण, त्याची स्वतःची एक ताकद असते. ही ताकद एकत्र झाल्यानंतर या जागा वाढणार आहेत.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Shiv Sena: अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला छळतेय ‘ही’ भीती; वाचा Inside Story

दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितलं की, “आज जे मंत्रिमंडळ झालंय, या मंत्रिमंडळामुळे काही लोकांच्या… आता आमचेच काही कार्यकर्ते असे आहेत की, का झालं, कसं काय झालं, हे का झालं, ते झालं असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. मग हे मंत्रिमंडळ चालेल कसं. यांना एवढी मंत्रिपद दिली. तुम्हाला काय मिळणार, त्याला काय मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांकडे (देवेंद्र फडणवीस) आहेत. हा प्लॅन करून केलेला आहे. आता या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता या रविवारपर्यंत दुसरा विस्तार मंत्रिमंडळाचा होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

वाचा >> शरद पवारांचे निर्णय प्रफुल पटेल बदलू शकतात का? आता पुढे काय होणार?

“मंत्रिमंडळाचा विस्तार होणार पण संजय शिरसाट यांचं काय होणार? त्यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली नाही असं तुम्हाला म्हणायचं का? माझं काय किंवा भरत गोगावलेंचं काय किंवा इतरांचं काय, तसं भाजपमध्ये सुद्धा अनेक आहेत. प्रविण दरेकर, संजय कुंटेंचं काय? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा या आठवड्यात होईल. सगळं सोडून द्यायचं मग सत्ता काय कामाची? मग सत्तेमध्ये राहायचं कशाला? असं होत नाही. त्यांनी संतुलन करण्याचा प्रयत्न केला आहे”, असं सांगताना संजय शिरसाटांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

“आमचे हात रिकामे झाले असे समजायचे कारण नाही”

“या तडजोडी कराव्या लागतात. त्यामध्ये काही आता असलेले मंत्री राहतील का? किंवा इतरांना सामावून कसं घेता येईल. हे नियोजन करण्याचं काम दोन्ही नेत्यांचं आहे. त्यांनी ते करावं. हे झाले आणि ते होणार नाहीत, असं नाही. न्याय हा दिला जाईल आणि न्याय द्यावा लागेल. न्याय दिल्याशिवाय जमणार नाही. कारण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. सत्तेमध्ये आज राष्ट्रवादी आमच्याबरोबर आलीये. मग आता आमचे हात रिकामे झाले असे समजायचे काहीच कारण नाही. संतुलन ठेवणारे लोक मजबूत आहेत”, असं उत्तर शिरसाट यांनी दिलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT