Maharashtra Day: 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र कसं बनलेलं वेगळं राज्य, तुम्हाला माहितीए का महाराष्ट्राची ही रक्तरंजित कहाणी?

सुधीर काकडे

Maharashtra Day: दोन्ही बाजूंच्या मागण्या लक्षात घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता. मुंबई आपल्याला मिळणार नाही ही माहिती जेव्हा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली, तेव्हा लोकांमध्ये राग निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठी आणि गुजराती भाषिकांचा 'मुंबई'साठी संघर्ष

point

मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाने दिला होता नकार

point

महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी कसा करावा लागला होता संघर्ष?

Maharashtra Din : 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील वेगवेगळी राज्य, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. 

1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत अनेक राज्यांची निर्मिती करण्यात आली. या कायद्याअंतर्गत कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक, तेलगू भाषिकांना आंध्र प्रदेश, मल्याळम भाषिकांसाठी केरळ आणि  आणि तमिळसाठी तामिळनाडू राज्यांची निर्मिती करण्यात आली. 

मराठी-गुजराती एकाच प्रांतात

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी आणि गुजराती भाषा बोलणारी लोकं तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात म्हणजे एकाच राज्यात होती. पण पुढे इतर राज्यांप्रमाणे आम्हालाही वेगळं राज्य मिळावं अशी मागणी होऊ लागली. मराठी आणि गुजरातीच्या आधारावर भाषावार प्रांत रचना व्हावी अशी मागणी जोर धरत होती. गुजराती भाषिकांना स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. तर, मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. 

हे ही वाचा >> रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये आढळला शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह, सोलापूर पुन्हा हादरलं, घटना काय?

दोन्ही बाजूंच्या मागण्या लक्षात घेऊन स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता. मुंबई आपल्याला मिळणार नाही ही माहिती जेव्हा मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली, तेव्हा लोकांमध्ये राग निर्माण झाला. मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याच्या भावनेतून चीड निर्माण झाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp